Ravindra Vaikar : अखेर ईडीने घरावर छापेमारी केलीच! ठाकरे गटाचे रवींद्र वायकर सापडले कचाट्यात

वायकरांशी संबंधित आणखी सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी


मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून जोगेश्वरी (Jogeshwari) येथील भूखंडासंबंधी चर्चेत असलेलं प्रकरण लवकरच निकालात निघणार आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) कचाट्यात सापडणार आहेत. रवींद्र वायकर यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापेमारी (ED raids) केली. ऐन निवडणुकीच्या ठाकरे गटाचा आणखी एक प्रमुख नेता अडचणीत सापडल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.


जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रवींद्र वायकर यांच्या घरी धाड टाकली. आज सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू होती. ईडीच्या १० ते १२ जणांच्या पथकाने त्यांच्या घरी झाडाझडती सुरू केली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्रं मिळतात का? याची चाचपणी केली जात आहे.


जोगेश्वरी भागात मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप त्यांच्यावर आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता. सप्टेंबर महिन्यात या प्रकरणी कारवाई करत ईडीने वायकरांसह त्यांची पत्नी व इतर सहा संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पुढील कारवाई करत ईडीने वायकर यांच्याविरोधात केस दाखल केली. आता ईडीच्या छापेमारीतून काय पुढे येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी