Mohammad Shami : राष्ट्रपतींच्या हस्ते मोहम्मद शामीचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकात (Cricket Worldcup) आपल्या तुफान गोलंदाजीने ज्याने भल्याभल्या खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवले तो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला (Mohammad Shami) आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आज खेलरत्न पुरस्कारांच्या वितरणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात क्रिकेट विश्वात भारताचे नाव उंचावल्यामुळे मोहम्मद शामीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.



नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शामी याने सर्वांनाच प्रभावित केले होते. दुखापत असतानाही मोहम्मद शामी याने दमदार कामगिरी केली होती. त्याच्यासह २६ जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन) आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन) यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.


शामीने यावर्षी भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. शामी पहिल्या ४ सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने कहर केला. शामीने स्पर्धेत ७ सामने खेळले, ज्यात त्याने सर्वाधिक २४ विकेट घेतल्या. शामीने विश्वचषकात ५.२६ च्या सरासरीने या विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.


शामी म्हणाला की, "हा पुरस्कार मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण अख्खं आयुष्य निघून गेलं तरी पुरस्कार मिळत नाही. पण आज पुरस्कार मिळतोय, यामुळे अभिमान वाटतो आहे. यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही", अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी