Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेला काळीमा! आठ महिला पोलिसांवर तीन वरिष्ठांकडून अत्याचार

घटनेचे व्हिडीओ बनवले, गर्भपात करण्यास भाग पाडले; भयंकर प्रकाराने पोलीस दल हादरलं


मुंबई : पोलीस म्हणजे समाजाचे रक्षक. समाजात होत असलेल्या गुन्हेगारीला रोखणं हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य असतं. पण हेच पोलीस गुन्हेगार झाले तर? मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातून असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या घटनेने अख्खं पोलीस दल हादरलं आहे. मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार (Rape) करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील या अधिकाऱ्यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. एवढंच नाहीतर एक महिला पोलीस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गर्भपात (Abortion) करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे.


महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच