Devendra Fadnavis : राज्यातील सर्व ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे हटवणार

  69

गडचिरोली जिल्ह्याला पुढील वर्षासाठी ५०० कोटी रुपये मंजूर; जिल्ह्याचा होणार विकास


गडचिरोली जिल्हा नियोजनाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती


नागपूर : राज्यांतील धार्मिक स्थळांवर होणारे अतिक्रमण हा एक गंभीर विषय आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच अशी कृत्ये करणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिकाही घेतली आहे. या अतिक्रमणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल भाष्य केले. राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक (Historical and religious places) स्थळांवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटविले जाईल, असं ते म्हणाले. काल फडणवीस यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गडचिरोली जिल्हा नियोजनाच्या घेतलेल्या बैठकीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.


कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पवनगडावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील सर्व ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवली जातील.



गडचिरोली जिल्ह्याचा करणार विकास


गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. शासनाकडून तेथे विविध उद्योग सुरू करण्यात आले आहेत. हा जिल्हा आता औद्योगिक केंद्र बनण्याच्या विचारात आहे. हे लक्षात घेऊन या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असेल. गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, असं त्यांनी सांगितलं.


ते पुढे म्हणाले की, भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. आम्ही जून २०२४ पासून तेथे प्रवेश कसा सुरू करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वनविभागाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करून सोडवण्यात आली. तसेच विद्युत विभागाच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. गतवर्षीच्या जिल्हा निधीपैकी ९९ टक्के निधी खर्च झाला आहे. चालू वर्षातील ६० टक्के खर्च आधीच पूर्ण झाला आहे. उर्वरित खर्च पुढील टक्केवारीत असेल. गडचिरोली जिल्ह्याला पुढील वर्षासाठी ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कोंडसरी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असून २० हजार कोटी रुपयांच्या दुसऱ्या प्रकल्पाची पायाभरणीही होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले

Shirdi Saibaba: साईबाबा मंदिरात लाखोंची चोरी, ३० वर्षांपासून सेवा देणारा मंदिर कर्मचारी अटक

शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज लाखों भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून भेट देत असतात, यामुळे साईबाबाबांच्या