Devendra Fadnavis : राज्यातील सर्व ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे हटवणार

गडचिरोली जिल्ह्याला पुढील वर्षासाठी ५०० कोटी रुपये मंजूर; जिल्ह्याचा होणार विकास


गडचिरोली जिल्हा नियोजनाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती


नागपूर : राज्यांतील धार्मिक स्थळांवर होणारे अतिक्रमण हा एक गंभीर विषय आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच अशी कृत्ये करणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिकाही घेतली आहे. या अतिक्रमणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल भाष्य केले. राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक (Historical and religious places) स्थळांवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटविले जाईल, असं ते म्हणाले. काल फडणवीस यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गडचिरोली जिल्हा नियोजनाच्या घेतलेल्या बैठकीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.


कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पवनगडावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील सर्व ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवली जातील.



गडचिरोली जिल्ह्याचा करणार विकास


गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. शासनाकडून तेथे विविध उद्योग सुरू करण्यात आले आहेत. हा जिल्हा आता औद्योगिक केंद्र बनण्याच्या विचारात आहे. हे लक्षात घेऊन या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असेल. गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, असं त्यांनी सांगितलं.


ते पुढे म्हणाले की, भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. आम्ही जून २०२४ पासून तेथे प्रवेश कसा सुरू करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वनविभागाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करून सोडवण्यात आली. तसेच विद्युत विभागाच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. गतवर्षीच्या जिल्हा निधीपैकी ९९ टक्के निधी खर्च झाला आहे. चालू वर्षातील ६० टक्के खर्च आधीच पूर्ण झाला आहे. उर्वरित खर्च पुढील टक्केवारीत असेल. गडचिरोली जिल्ह्याला पुढील वर्षासाठी ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कोंडसरी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असून २० हजार कोटी रुपयांच्या दुसऱ्या प्रकल्पाची पायाभरणीही होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची

Hinjewadi Accident News : डंपरच्या जोरदार धडकेत बापलेकीची ताटातूट! मुलीचा जागीच मृत्यू, वडील जखमी; हिंजवडी हादरले

हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरात (Hinjewadi Accident News) अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल

Suraj Chavan New House : 'गुलिगत किंग' बनला 'गृहस्थ'! भव्य हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्... सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराची 'पहिली झलक' पहाचं!

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक

Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने

इलेक्ट्रिक एसटी बसला राज्यातील द्रुतगती मार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती