Coastal Road : कोस्टल रोडचं ८३% काम पूर्ण; याच महिन्यात होणार खुला

मुंबई ते रायगड अंतर बारा मिनिटांत कापता येणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती


मुंबई : मुंबईच्या लोकसंख्येत (Mumbai Population) आणि पर्यायाने वाहतूक कोंडीत (Traffic Jam) दिवसेंदिवस वाढ होत आहे. नेहमीच्या ट्रॅफिक जामला मुंबईकर वैतागले असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं (Coastal Road) ८३% काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांकरता कोस्टल रोडच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुंबई आयुक्त इक्बाल चहल हे देखील यावेळी उपस्थित होते.


कोस्टल रोडची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोस्टल रोडच्या एका टनलचं (Tunnel) काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. तर दुसऱ्या टनलचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल अशी प्रणाली करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.



मविआ सरकारवर साधला निशाणा


मुख्यमंत्री म्हणाले, कोस्टल रोड ३१ जानेवारीला सुरु होईल. एमटीएचएल १२ जानेवारीला खुला होईल. यामुळे १२ मिनिटांत रायगड जिल्ह्यात जाता येणार आहे. हे सर्व विकासाचे प्रकल्प आहे. कोस्टल रोड वरळीपर्यंत न थांबता वांद्रे - वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार जाता येणार आहे. ही सर्व रखडलेली काम होती, आधीच्या लोकांनी ही कामं बंद पाडली होती, गतीमान पद्धतीनं आपण काम करतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला.



मुंबईला होणारा धोका टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी दिला जातो अहवाल


राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था या समुद्राच्या अभ्यास करणार्‍या यंत्रणेने कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढूळपणा यांचा अभ्यास केला. दर सहा महिन्यांनी सरकारकडे या यंत्रणेकडून अहवाल दिला जातो. त्यामुळे समुद्रातील आगामी धोक्यांची सूचना यंत्रणेला मिळू शकते .


तसेच कोस्टल रोड आणि पर्यायाने मुंबईचं संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशांतील कामांचा अभ्यास करुन बनवली गेली आहे. समुद्र भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडले गेले आहेत. समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र समुद्र भिंत बांधतांना वापरले गेले आहेत, ज्यामुळे मुंबईला संभाव्य धोक्यांपासून वाचवता येणार आहे.


Comments
Add Comment

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर