Rain Alert : पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात अवकाळी पाऊस!

स्कायमेटचा अंदाज, गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता


नवी दिल्ली : राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच अवकाळी पावसाने जोर धरला आहे. सांगली, कोल्हापूरनंतर काल रात्री नगर शहरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळीही तुरळक पाऊस झाला असून आजपासून पुढील ४८ तास पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाच्या या नव्या अंदाजाने शेतकरी धास्तावले आहेत.


खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटने (Skymet) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह बिहार, झारखंड, रायलसीमा या भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप या राज्यात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ८ जानेवारी रोजी मध्य प्रदेश आणि राजस्थानात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.


हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवेळी येणा-या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

Comments
Add Comment

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर