Rain Alert : पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात अवकाळी पाऊस!

  168

स्कायमेटचा अंदाज, गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता


नवी दिल्ली : राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच अवकाळी पावसाने जोर धरला आहे. सांगली, कोल्हापूरनंतर काल रात्री नगर शहरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळीही तुरळक पाऊस झाला असून आजपासून पुढील ४८ तास पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाच्या या नव्या अंदाजाने शेतकरी धास्तावले आहेत.


खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटने (Skymet) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह बिहार, झारखंड, रायलसीमा या भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप या राज्यात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ८ जानेवारी रोजी मध्य प्रदेश आणि राजस्थानात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.


हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवेळी येणा-या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व