मुंबई: भारतीय संघाने केपटाऊनमधील कसोटीत दक्षिण आफ्रिकेला(south africa) ७ विकेटनी हरवले. या तऱ्हेने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. तर सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यांमध्ये एखाद्या आशियाई संघाने पहिल्यांदा हरवले. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांचे मोलाचे योगदान राहिले. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना बाद केले.
टीम इंडियाच्या या शानदार विजयावर माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. सोबतच त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे जोरदार कौतुक केले आहे.
भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर पोस्ट करत म्हटले, टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधल्याचे अभिनंदन. मात्र एडन मार्करमने कमालीची फलंदाजी केली कारण अनेकदा पिचवर आक्रमक अंदाजात खेळणे हा सर्वात चांगला पर्याय असतो. जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने दाखवून दिले की अशा प्रकारच्या विकेटवर कोणत्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली पाहिजे.
टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ५५ धावांवर आटोपला. भारतासाठी मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. या पद्धतीने टीम इंडियाला ९८ धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर संपला. यावेळेस जसप्रीत बुमराहने ६ विकेट मिळवले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…