SA vs IND: सचिन तेंडुलकरकडून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक

मुंबई: भारतीय संघाने केपटाऊनमधील कसोटीत दक्षिण आफ्रिकेला(south africa) ७ विकेटनी हरवले. या तऱ्हेने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. तर सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यांमध्ये एखाद्या आशियाई संघाने पहिल्यांदा हरवले. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांचे मोलाचे योगदान राहिले. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना बाद केले.


टीम इंडियाच्या या शानदार विजयावर माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. सोबतच त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे जोरदार कौतुक केले आहे.



एडन मार्करमने कमाल फलंदाजी केली मात्र जसप्रीत बुमराह...


भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर पोस्ट करत म्हटले, टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधल्याचे अभिनंदन. मात्र एडन मार्करमने कमालीची फलंदाजी केली कारण अनेकदा पिचवर आक्रमक अंदाजात खेळणे हा सर्वात चांगला पर्याय असतो. जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने दाखवून दिले की अशा प्रकारच्या विकेटवर कोणत्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली पाहिजे.



अशी झाली केपटाऊन कसोटी


टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ५५ धावांवर आटोपला. भारतासाठी मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. या पद्धतीने टीम इंडियाला ९८ धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर संपला. यावेळेस जसप्रीत बुमराहने ६ विकेट मिळवले.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव