Jitendra Awhad : आव्हाडांना संत समाज माफ करणार नाही, तो समोर आला तर त्याचा वध करेन

अयोध्येतील परमहंस आचार्य महाराजांनी दिले खुले आव्हान


अयोध्या : शरद पवार गटातील नेते, मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भगवान श्री राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन आहे. तसेच राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे, असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्याबाबत आता भाजप आणि अजित पवार गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आव्हाडांच्या विरोधात निदर्शने केली.


दरम्यान, अयोध्येतील परमहंस आचार्य महाराज आव्हाड यांच्या वक्तव्यावर आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांना संत समाज माफ करणार नाही. तो समोर आला तर त्याचा वध करणार, असा इशारा परमहंस आचार्य महाराज यांनी दिला आहे.


परमहंस आचार्य महाराज म्हणाले, "जितेंद्र आव्हाड याच्यावर कडक कारवाई झाली नाही तर मी स्वत: त्या व्यक्तीचा वध करणार आहे. २४ तासात त्याच्यावर कारावई करावी, हा माझा केंद्र आणि राज्य सरकारला इशारा आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा कोणीही अपमान केला तर त्याला जीवंत सोडले जाणार नाही."

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च