कतारमध्ये ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेविरोधात अपील करणार भारत! परराष्ट्र मंत्रालयाचे अपडेट

कतार: कतारच्या जेलमध्ये बंद असलेले ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना २८ डिसेंबरला दिलासा देताना येथील कोर्टाने मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यातच गुरूवारी भारताने सांगितले की ते ८ लोकांना मिळालेल्या शिक्षेच्या विरोधात ६० दिवसांच्या आत अपील करू शकतात.


परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले, कतारच्या कोर्ट ऑफ अपीलने २८ डिसेंबरला निर्णय सुनावला होता. यानंतर आम्ही सांगितले की या आठ लोकांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. आमच्या कायदेशीर टीमकडे कोर्टाची ऑर्डर आहे. ही गोपनीय ऑर्डर आहे. आम्ही इतके नक्की म्हणू शकतो की आठही जणांना विविध कालावधीची शिक्षा मिळाली आहे.


ते पुढे म्हणाले, मृत्यूची शिक्षा संपली आहे. आमच्याकडे ६० दिवसांचा कालावधी आहे आणि आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायलय The Court of Cassationचा दरवाजा ठोठावू शकतो. याबाबतीत कायदेशीर टीम काम करत आहे. आम्ही कायदेशीर टीम आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहोत.



काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?


८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना दिलासा देण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने २८ डिसेंबरला म्हटले होते की आम्ही यांच्यासोबत सुरूवातीपासून उभे राहिलो आहोत. आमचे राजदूत आणि अन्य अधिकारी कुटुंबाती सदस्यांसोबत आहेत. आम्ही या केसच्या सुरूवातीपासून त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांना नेहमी सहकार्य करत राहू.



काय आहे प्रकरण


कतार स्थित अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या ८ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्या ऑगस्टमध्ये हेरगिरीच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान कतारने या आरोपांबाबत काही म्हटले नाही.

Comments
Add Comment

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय