कतारमध्ये ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेविरोधात अपील करणार भारत! परराष्ट्र मंत्रालयाचे अपडेट

कतार: कतारच्या जेलमध्ये बंद असलेले ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना २८ डिसेंबरला दिलासा देताना येथील कोर्टाने मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यातच गुरूवारी भारताने सांगितले की ते ८ लोकांना मिळालेल्या शिक्षेच्या विरोधात ६० दिवसांच्या आत अपील करू शकतात.


परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले, कतारच्या कोर्ट ऑफ अपीलने २८ डिसेंबरला निर्णय सुनावला होता. यानंतर आम्ही सांगितले की या आठ लोकांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. आमच्या कायदेशीर टीमकडे कोर्टाची ऑर्डर आहे. ही गोपनीय ऑर्डर आहे. आम्ही इतके नक्की म्हणू शकतो की आठही जणांना विविध कालावधीची शिक्षा मिळाली आहे.


ते पुढे म्हणाले, मृत्यूची शिक्षा संपली आहे. आमच्याकडे ६० दिवसांचा कालावधी आहे आणि आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायलय The Court of Cassationचा दरवाजा ठोठावू शकतो. याबाबतीत कायदेशीर टीम काम करत आहे. आम्ही कायदेशीर टीम आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहोत.



काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?


८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना दिलासा देण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने २८ डिसेंबरला म्हटले होते की आम्ही यांच्यासोबत सुरूवातीपासून उभे राहिलो आहोत. आमचे राजदूत आणि अन्य अधिकारी कुटुंबाती सदस्यांसोबत आहेत. आम्ही या केसच्या सुरूवातीपासून त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांना नेहमी सहकार्य करत राहू.



काय आहे प्रकरण


कतार स्थित अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या ८ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्या ऑगस्टमध्ये हेरगिरीच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान कतारने या आरोपांबाबत काही म्हटले नाही.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११