कतारमध्ये ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेविरोधात अपील करणार भारत! परराष्ट्र मंत्रालयाचे अपडेट

Share

कतार: कतारच्या जेलमध्ये बंद असलेले ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना २८ डिसेंबरला दिलासा देताना येथील कोर्टाने मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यातच गुरूवारी भारताने सांगितले की ते ८ लोकांना मिळालेल्या शिक्षेच्या विरोधात ६० दिवसांच्या आत अपील करू शकतात.

परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले, कतारच्या कोर्ट ऑफ अपीलने २८ डिसेंबरला निर्णय सुनावला होता. यानंतर आम्ही सांगितले की या आठ लोकांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. आमच्या कायदेशीर टीमकडे कोर्टाची ऑर्डर आहे. ही गोपनीय ऑर्डर आहे. आम्ही इतके नक्की म्हणू शकतो की आठही जणांना विविध कालावधीची शिक्षा मिळाली आहे.

ते पुढे म्हणाले, मृत्यूची शिक्षा संपली आहे. आमच्याकडे ६० दिवसांचा कालावधी आहे आणि आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायलय The Court of Cassationचा दरवाजा ठोठावू शकतो. याबाबतीत कायदेशीर टीम काम करत आहे. आम्ही कायदेशीर टीम आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहोत.

काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?

८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना दिलासा देण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने २८ डिसेंबरला म्हटले होते की आम्ही यांच्यासोबत सुरूवातीपासून उभे राहिलो आहोत. आमचे राजदूत आणि अन्य अधिकारी कुटुंबाती सदस्यांसोबत आहेत. आम्ही या केसच्या सुरूवातीपासून त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांना नेहमी सहकार्य करत राहू.

काय आहे प्रकरण

कतार स्थित अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या ८ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्या ऑगस्टमध्ये हेरगिरीच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान कतारने या आरोपांबाबत काही म्हटले नाही.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

46 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

47 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

49 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

1 hour ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

2 hours ago