केपटाऊन: केपटाऊनमध्ये(capetown) टीम इंडियाने(team india) इतिहास रचला. भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटीत सात विकेटनी हरवले. यासोबतच टीम इंडियाच्या नावावर मोठा रेकॉर्ड केला आहे. खरंतर, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यात हरवणाला आशियातील पहिला देश ठरला आहे. तर टीम इंडियाने ३१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा केपटाऊनमध्ये विजय मिळवला.
तर ओव्हरच्या हिशेबाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना ठरला. या कसोटी सामन्यात केवळ १०७ षटकांचा खेळ होऊ शकला. केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध नेहमी जिंकणारा आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ ५५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात एडन मार्करमने जबरदस्त शतक ठोकले. मात्र संपूर्ण संघ १७६ धावांवर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेत भारताने पाचव्यांदा अनेक कसोटी सामने जिंकले आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने २०२१, २०१८, २०१० आणि २००६मध्ये विजय मिळवला होता. दरम्यान, केपटाऊनमध्ये याआधी भारताला कधीही विजय मिळवता आला नव्हता.
केपटाऊनमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने पहिल्या डावात केवळ ५५ धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. यात भारताने ९८ धावांची आघाडी घेतली होती. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने दुसऱ्या डावात १७६ धावा केल्या. भारतासमोर ७९ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाने तीन विकेट गमावताना दीड दिवसांतच केपटाऊन कसोटी जिंकली.
भारतासाठी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह विजयाचा हिरो ठरला. सिराजने पहिल्या डावात केवळ १६ धावा देत ६ विकेट मिळवल्या. यानंतर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला खिंडार पाडली.
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…
आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…
एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी…
मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची…
मात्र 'या' वाहनांच्या वाहतुकीवर बंदी मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणाऱ्या गोखले पुलाची…