केपटाऊन: केपटाऊनमध्ये(capetown) टीम इंडियाने(team india) इतिहास रचला. भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटीत सात विकेटनी हरवले. यासोबतच टीम इंडियाच्या नावावर मोठा रेकॉर्ड केला आहे. खरंतर, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यात हरवणाला आशियातील पहिला देश ठरला आहे. तर टीम इंडियाने ३१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा केपटाऊनमध्ये विजय मिळवला.
तर ओव्हरच्या हिशेबाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना ठरला. या कसोटी सामन्यात केवळ १०७ षटकांचा खेळ होऊ शकला. केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध नेहमी जिंकणारा आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ ५५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात एडन मार्करमने जबरदस्त शतक ठोकले. मात्र संपूर्ण संघ १७६ धावांवर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेत भारताने पाचव्यांदा अनेक कसोटी सामने जिंकले आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने २०२१, २०१८, २०१० आणि २००६मध्ये विजय मिळवला होता. दरम्यान, केपटाऊनमध्ये याआधी भारताला कधीही विजय मिळवता आला नव्हता.
केपटाऊनमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने पहिल्या डावात केवळ ५५ धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. यात भारताने ९८ धावांची आघाडी घेतली होती. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने दुसऱ्या डावात १७६ धावा केल्या. भारतासमोर ७९ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाने तीन विकेट गमावताना दीड दिवसांतच केपटाऊन कसोटी जिंकली.
भारतासाठी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह विजयाचा हिरो ठरला. सिराजने पहिल्या डावात केवळ १६ धावा देत ६ विकेट मिळवल्या. यानंतर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला खिंडार पाडली.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…