IND vs SA: केपटाऊनमध्ये द. आफ्रिकेला हरवणारा आशियातील पहिला देश ठरला भारत

केपटाऊन: केपटाऊनमध्ये(capetown) टीम इंडियाने(team india) इतिहास रचला. भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटीत सात विकेटनी हरवले. यासोबतच टीम इंडियाच्या नावावर मोठा रेकॉर्ड केला आहे. खरंतर, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यात हरवणाला आशियातील पहिला देश ठरला आहे. तर टीम इंडियाने ३१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा केपटाऊनमध्ये विजय मिळवला.


तर ओव्हरच्या हिशेबाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना ठरला. या कसोटी सामन्यात केवळ १०७ षटकांचा खेळ होऊ शकला. केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध नेहमी जिंकणारा आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ ५५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात एडन मार्करमने जबरदस्त शतक ठोकले. मात्र संपूर्ण संघ १७६ धावांवर बाद झाला.


दक्षिण आफ्रिकेत भारताने पाचव्यांदा अनेक कसोटी सामने जिंकले आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने २०२१, २०१८, २०१० आणि २००६मध्ये विजय मिळवला होता. दरम्यान, केपटाऊनमध्ये याआधी भारताला कधीही विजय मिळवता आला नव्हता.


केपटाऊनमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने पहिल्या डावात केवळ ५५ धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. यात भारताने ९८ धावांची आघाडी घेतली होती. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने दुसऱ्या डावात १७६ धावा केल्या. भारतासमोर ७९ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाने तीन विकेट गमावताना दीड दिवसांतच केपटाऊन कसोटी जिंकली.


भारतासाठी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह विजयाचा हिरो ठरला. सिराजने पहिल्या डावात केवळ १६ धावा देत ६ विकेट मिळवल्या. यानंतर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला खिंडार पाडली.

Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे