Jr NTR : आरआरआर फेम ज्युनियर एनटीआरने अनुभवले जपानमधले भूकंपाचे धक्के!

थरारक अनुभव ट्वीट करत म्हणाला...


मुंबई : नववर्षाचं स्वागत (Welcome new year) करण्यासाठी आणि सुट्टीत निवांत वेळ घालवण्यासाठी अनेकजण इतर देशांमध्ये फिरायला जातात. आरआरआर (RRR) फेम भारतीय अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) देखील असाच आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी जपानमध्ये (Japan) गेला होता. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के (Earthquake)जाणवले. यावेळी ज्युनिअर एनटीआर तिथेच होता आणि त्याने हे भूकंपाचे धक्के अनुभवले. सध्या तो सुखरुप भारतात परतला असून ट्वीट (Tweet) करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.


ज्युनियर एनटीआर गेल्या आठवड्यात तो आपल्या कुटुंबियांसोबत जपानला गेला होता. मात्र जपानमध्ये भूकंप आल्याने त्याला भारतात परतावं लागलं. त्याने ट्वीट केलं आहे की, "जपानहून आज भारतात घरी परतलो आहे. तिथे आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मलादेखील धक्का बसला आहे. आठवडाभर मी जपानमध्ये होतो. या भूकंपाचा धक्का बसलेल्या प्रत्येकासाठी मला वाईट वाटत आहे. तुम्ही सर्व ज्या बहादुरीने या संकटाचा सामना करत आहात त्याबद्दल अप्रुप वाटतं. लवकरच सर्व काही ठीक होईल. स्टे स्ट्राँग, जपान", अशा भावना त्याने या ट्वीटमधून व्यक्त केल्या आहेत.


ज्युनियर एनटीआर नेहमीच त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसतो. अनेकदा तो देशाबाहेर जातो. नववर्षाच्या स्वागतासाठी तो पत्नी, लक्ष्मी प्रणती आणि अभय, भार्गव या दोन मुलांसह जपानला गेला होता. तो जेव्हा भारतात परत आला तेव्हा जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीची मोठी घटना घडली. त्यामुळे ज्युनियर एनटीआर या नैसर्गिक आपत्तीपासून (Natural calamity) थोडक्यात बचावला आहे.





दरम्यान, भूकंप आणि त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर, जपानच्या किनारी भागात राहणाऱ्या लोकांना तात्काळ सुरक्षितस्थळी शिफ्ट होण्यास सांगितलं होते. यामध्ये उंचच उंच इमारतींमध्ये आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जॅपनिज पब्लिक ब्रॉडकास्टरनं माहिती दिली की, जास्तीत जास्त २१ भूकंपाचे धक्के जाणवल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत आठ जणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च