Ranvir Shorey : प्रभू रामाने मला माफ करुन सद्बुद्धी द्यावी

राम मंदिराला विरोध केलेल्या बॉलिवूड अभिनेत्याने मागितली जाहीर माफी


मुंबई : देशभरात सर्वत्र राम मंदिराच्या उद्धाटनाची (Ram Mandir inauguration)उत्सुकता आहे. एखाद्या सणाप्रमाणे संपूर्ण भारतभरात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र, काही विरोधक या गोष्टीचं राजकारण करत आहेत. बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) रणवीर शौकीने (Ranvir Shorey) देखील राम मंदिराला विरोध करत शाळा अथवा हॉस्पिटलची मागणी केली होती. मात्र, आपली चूक लक्षात आल्याचे सांगत त्याने सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. प्रभू रामाने मला माफ करुन सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना त्याने केली आहे.

रणवीरने एक ट्विट (Tweet) शेअर करत याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे, "अयोध्या राम मंदिराच्या जागी स्मारक किंवा हॉस्पिटल बनवू इच्छिणाऱ्या काही हिंदूंपैकी मीदेखील एक होतो, जेणेकरुन आपल्या समाजात अनेक काळापासून असलेले संघर्ष संपतील. पण, आज यासाठी मला स्वत:ची लाज वाटत आहे. शांतीसाठी मी धर्म आणि धार्मिकतेचं बलिदान द्यायला निघालो होतो. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या मूल्यांवर मी ठाम राहिलो नाही याबाबत मला लाज वाटत आहे," असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.



पुढे रणवीर म्हणतो, "सत्य आणि न्यायासाठी ही कठीण लढाई लढणाऱ्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मी भगवान राम यांच्याकडे माफी मागतो आणि मला सुद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो. आपल्या या भूमीवर धर्म कायम रहावा आणि सगळ्या भारतीयांच्या जीवनात शांती, समृद्धी यावी यासाठी मी प्रार्थना करतो. जय श्री राम." रणवीरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. कंगनाने रणवीरचं हे ट्वीट लाइक केलं आहे. तर अनुपम खेर यांनी 'जय श्री राम' असं लिहिलं आहे.
Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत