पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती...

मुंबई (प्रतिनिधी): आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे रविवारी ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. रजनीश शेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख कोण होणार? हे नवीन वर्षात ठरणार आहे.


राज्याच्या पोलीस महासंचलाकपदासाठी कोणाची नियुक्ती करावी? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत रश्मी शुक्लांना महासंचालक बनवण्याचे ठरले. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र संवर्गीय अधिकारी सशास्त्री सीमा दलाचे महासंचालक म्हणून काम केले आहे.


तसेच, सेंट्रल रिझर्व पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पोस्ट करण्यापूर्वी शुक्ला यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर विंगच्या संचालक म्हणून काम करण्यासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Comments
Add Comment

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.