पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती...

  238

मुंबई (प्रतिनिधी): आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे रविवारी ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. रजनीश शेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख कोण होणार? हे नवीन वर्षात ठरणार आहे.


राज्याच्या पोलीस महासंचलाकपदासाठी कोणाची नियुक्ती करावी? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत रश्मी शुक्लांना महासंचालक बनवण्याचे ठरले. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र संवर्गीय अधिकारी सशास्त्री सीमा दलाचे महासंचालक म्हणून काम केले आहे.


तसेच, सेंट्रल रिझर्व पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पोस्ट करण्यापूर्वी शुक्ला यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर विंगच्या संचालक म्हणून काम करण्यासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Comments
Add Comment

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै

पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट! कोकण, मराठवाड्यातही वादळी पावसाचा अंदाज; IMD ने माहिती दिली

महाराष्ट्र : दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून,