Akshay Kumar : मला वाटलं होतं मी सुंदर मुलीशी लग्न केलंय, पण...

ट्विंकल खन्नाच्या वाढदिवशी अक्षय कुमारने ही काय पोस्ट केली?


मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी (Bollywood Khiladi) अक्षय कुमार (Akshay Kumar) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतो. आपली पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) व मुलांसोबतचे फोटोज तो कायम सोशल मीडियावर शेअर करतो. ट्विंकल खन्नाशी २००१ मध्ये त्याने लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधलं हे चाहत्यांच्या आवडीचं एक कपल आहे. पण ट्विंकल खन्नाच्या वाढदिवशी (Twinkle Birthday) अक्षय कुमारने केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. आज ट्विंकलचा वाढदिवस असून अक्षय तिच्याबद्दल जे म्हणाला, ते पाहून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.


अक्षयने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ट्विंकलचा सुंदर सफेद रंगाचा वनपीस परिधान केलेला फोटो दिसतो आणि लिहिलेले दिसते की, 'मला वाटलं होतं मी या मुलीशी लग्न केलंय' (Who I thought i marrried). त्यानंतर 'पण खरंतर मी कोणाशी लग्न केलंय' (Who I Actually married) असं लिहिलेली एक स्क्रीन दिसते आणि ट्विंकल हॉलिवूड कॅरेक्टर हल्कच्या पुतळ्यासमोर उभी असलेली दिसते. ती स्वतःला उद्देशून म्हणते, 'ये है पुतला और यह है असली हल्क' आणि हल्कसारखी ओरडते. ट्विंकलचा हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत अक्षयने खास अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.





कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिलं आहे, 'दीर्घायुषी हो माझी हल्क. तुझ्या विनोदबुद्धीने आपलं आयुष्य वाढवल्याबद्दल तुझे खूप आभार. देव तुला आणखी आयुष्य देवो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा टिना', असं म्हणत अक्षयने आपल्या पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत ट्विंकलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी दोघांची जोडी कायम अशीच राहू देत, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,

पंतप्रधान १७ सप्टेंबरला सुरू करणार एक विशेष मोहीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी एका विशेष अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. हे अभियान संपूर्ण

देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण? आज होणार निवडणूक, काही तासांतच होणार निर्णय

नवी दिल्ली: भारताच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज संसद भवनात मतदान होणार आहे. या पदासाठी सामना एनडीएचे

मतदान ओळखपत्र नोंदणीसाठी 'आधार' बारावा दस्तऐवज; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

नवी दिल्ली: बिहारमधील एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला

सीमेवर लावणार अत्याधुनिक रडार प्रणाली

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांनंतर, भारतीय लष्कराने उत्तरी आणि पश्चिम सीमेवर

केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्री नव्या नायरला १.१४ लाखांचा दंड!

मुंबई: लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री नव्या नायर हिला ऑस्ट्रेलियात एका साध्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.