Sayali Sanjeev and Rishi Saxena : नवं शूट नेमकं कशासाठी? 'काहे दिया परदेस'मधील शिवने शेअर केला गौरीसोबतचा फोटो

मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) 'काहे दिया परदेस' (Kahe diya Pardes) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकांपैकी एक होती. यातील मराठी मुलगी गौरी आणि उत्तर भारतीय मुलगा शिव यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. शिवाय यातील इतर पात्रांचा अभिनयही अगदी उत्तम जुळून आल्याने प्रेक्षकांना ही मालिका अत्यंत जवळची वाटत होती. पण इतर मालिका जशा चार ते पाच वर्ष ताणल्या जातात तशी ही मालिका ताणली गेली नाही. मार्च २०१६ ते सप्टेंबर २०१७ असं साधारण दीड वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हे देखील मालिकेच्या लोकप्रियतेचं एक कारण असू शकतं.


मालिका संपल्यानंतर आता तब्बल ७ वर्षांनी मालिकेतील शिव-गौरी (Shiv Gauri) म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि अभिनेता रिषी सक्सेना (Rishi Saxena) यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. मात्र, ते मालिकेच्या दुसर्‍या भागासाठी एकत्र आले नसून त्यांचा एक नवा सिनेमा येणार आहे, ज्याचं नुकतंच शूटिंग पूर्ण झालं आहे. रिषी आणि सायली मालिकेनंतर अनेक वेगवेगळ्या सिनेमा-मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते, मात्र त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे.


रिषीने सोशल मीडियावर त्यांच्या आगामी सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली. 'समसारा चॅप्टर १' (Samsara chapter 1) असं या सिनेमाचं नाव असून काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली होती. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो रिषीने शेअर केले. त्यामधील रिषी-सायलीचा एकत्र फोटो पाहून चाहते खूश झाले. त्यांनी कमेंट्समधून आनंद व्यक्त करत या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





'जन्म-मृत्यूच्या द्वंदाची एक अनोखी गोष्ट' असं या सिनेमाबबातची घोषणा करताना सांगण्यात आलं होतं. सायली-रिषी यांच्यासह सिनेमात साक्षी गांधी, तनिष्का विशे, प्रियदर्शिनी इंदलकर, पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी अशी स्टारकास्ट असणार आहे. सागर लाढे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.