Quatar : कतारमध्ये ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

नवी दिल्ली: कतारमध्ये(quatar) मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आणण्यात आली आहे. याबाबत भारत सरकारने म्हटले की आम्ही ८ जणांच्या कुटुंबियांसोबत नेहमी आहोत. भाजपने हा मोदी सरकारचा विजय असल्याचे म्हटले आहे तर काँग्रेसनेही याबाबत आनंद व्यक्त केला.


या महिन्यात दुबईत कोप २८ संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानीसोबत भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर हा निर्णय आला. पंतप्रधान मोदी आणि बिन हमद अल थानी यांनी सांगितले होते की त्यांच्यात भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबतही चर्चा झाली होती. यामुळे भारताच्या कूटनीतीचा हा विजय मानला जात आहे.



काय म्हटलेय परराष्ट्र मंत्रालयाने?


परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, कतारच्या अपील न्यायालयाने दहरा ग्लोबल केसमध्ये ८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केली आहे. निर्णयाच्या तपशीलाची प्रतीक्षा असणार आहे. तचारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी गुरूवारी न्यायालयात हजर होते. याशिवाय सर्व खलाशांचे कुटुंबही तेथेच होते. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरूवातीपासूनच उभे आहोत. भविष्यातही कॉन्सुलर अॅक्सेससह सर्व मदत करू.



काय आहे प्रकरण?


कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, कतारने आरोपांबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही.

Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज