Quatar : कतारमध्ये ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

नवी दिल्ली: कतारमध्ये(quatar) मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आणण्यात आली आहे. याबाबत भारत सरकारने म्हटले की आम्ही ८ जणांच्या कुटुंबियांसोबत नेहमी आहोत. भाजपने हा मोदी सरकारचा विजय असल्याचे म्हटले आहे तर काँग्रेसनेही याबाबत आनंद व्यक्त केला.


या महिन्यात दुबईत कोप २८ संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानीसोबत भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर हा निर्णय आला. पंतप्रधान मोदी आणि बिन हमद अल थानी यांनी सांगितले होते की त्यांच्यात भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबतही चर्चा झाली होती. यामुळे भारताच्या कूटनीतीचा हा विजय मानला जात आहे.



काय म्हटलेय परराष्ट्र मंत्रालयाने?


परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, कतारच्या अपील न्यायालयाने दहरा ग्लोबल केसमध्ये ८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केली आहे. निर्णयाच्या तपशीलाची प्रतीक्षा असणार आहे. तचारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी गुरूवारी न्यायालयात हजर होते. याशिवाय सर्व खलाशांचे कुटुंबही तेथेच होते. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरूवातीपासूनच उभे आहोत. भविष्यातही कॉन्सुलर अॅक्सेससह सर्व मदत करू.



काय आहे प्रकरण?


कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, कतारने आरोपांबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११