Vijayakanth : कोरोना नाही तर सुपरस्टार विजयकांत यांची हत्या?

दिग्दर्शकाने केलेल्या दाव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण


चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि डीएमडीके प्रमुख विजयकांत (Vijayakanth) यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर (social media) अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. त्यातच, मल्याळम दिग्दर्शक अल्फोन्स पुथरेन (Alphonse Puthren) यांनी विजयकांत यांची हत्या केल्याचा दावा केला आहे, यामुळे त्याच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.


त्यांच्या इंस्टाग्रामवर युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासाठी एक पोस्ट शेअर करताना अल्फोन्सने लिहिले आहे की, ‘मी तुम्हाला भेटण्यासाठी केरळमध्ये आलो आणि मी तुम्हाला विचारले की तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांची हत्या कोणी केली? जयललिता यांची हत्या कोणी केली? आता तुम्हाला शोधावे लागेल की कॅप्टन विजयकांतलाही कोणी मारले…? अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर दिसत आहे.


ते पुढे लिहितात की, ‘जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर त्यांनी कमल हासन आणि तुमचे वडील एमके स्टॅलिन सर यांच्यावरही हल्ला केला आहे. तरीही तुम्ही खुनी पकडण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुढचे लक्ष्य तुम्ही किंवा स्टॅलिन साहेब असतील.



शिवाय अल्फोन्सने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी तामिळ अभिनेता अजित कुमारला टॅग केले आहे आणि लिहिले आहे, ‘मी ऐकले होते की तुम्ही लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहात. पण हे अजून दिसलेले नाही. एकतर ज्यांनी मला ही बातमी दिली ते खोटे बोलले असावे, नाहीतर लोक तुमच्याविरुद्ध कट करत आहेत हे तुम्ही विसरलात. तुम्ही याबद्दल काहीही का बोलत नाही? कृपया या प्रश्नाचे उत्तर मला जाहीर पत्राद्वारे द्या.


मात्र, अल्फोन्सच्या या प्रश्नांची उत्तरे अद्याप कोणीही दिलेली नाहीत. किंवा त्यांचा दावाही कोणी खोडून काढलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी