Vijayakanth : कोरोना नाही तर सुपरस्टार विजयकांत यांची हत्या?

दिग्दर्शकाने केलेल्या दाव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण


चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि डीएमडीके प्रमुख विजयकांत (Vijayakanth) यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर (social media) अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. त्यातच, मल्याळम दिग्दर्शक अल्फोन्स पुथरेन (Alphonse Puthren) यांनी विजयकांत यांची हत्या केल्याचा दावा केला आहे, यामुळे त्याच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.


त्यांच्या इंस्टाग्रामवर युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासाठी एक पोस्ट शेअर करताना अल्फोन्सने लिहिले आहे की, ‘मी तुम्हाला भेटण्यासाठी केरळमध्ये आलो आणि मी तुम्हाला विचारले की तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांची हत्या कोणी केली? जयललिता यांची हत्या कोणी केली? आता तुम्हाला शोधावे लागेल की कॅप्टन विजयकांतलाही कोणी मारले…? अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर दिसत आहे.


ते पुढे लिहितात की, ‘जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर त्यांनी कमल हासन आणि तुमचे वडील एमके स्टॅलिन सर यांच्यावरही हल्ला केला आहे. तरीही तुम्ही खुनी पकडण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुढचे लक्ष्य तुम्ही किंवा स्टॅलिन साहेब असतील.



शिवाय अल्फोन्सने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी तामिळ अभिनेता अजित कुमारला टॅग केले आहे आणि लिहिले आहे, ‘मी ऐकले होते की तुम्ही लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहात. पण हे अजून दिसलेले नाही. एकतर ज्यांनी मला ही बातमी दिली ते खोटे बोलले असावे, नाहीतर लोक तुमच्याविरुद्ध कट करत आहेत हे तुम्ही विसरलात. तुम्ही याबद्दल काहीही का बोलत नाही? कृपया या प्रश्नाचे उत्तर मला जाहीर पत्राद्वारे द्या.


मात्र, अल्फोन्सच्या या प्रश्नांची उत्तरे अद्याप कोणीही दिलेली नाहीत. किंवा त्यांचा दावाही कोणी खोडून काढलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या