India Vs South Africa Test series : लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर आयसीसीची मोठी कारवाई; थेट सहाव्या स्थानावर गेला भारताचा संघ!

काय आहे कारण?


केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना (India Vs South Africa Test series) काल पार पडला. यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा भारत थेट पाचव्या स्थानावर घसरला. हा भारतासाठी पहिला मोठा धक्का होता. पण यानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे भारताची रवानगी गुणतालिकेत पाचव्या स्थानावरुनही खाली सहाव्या स्थानावर झाली आहे. तर सहाव्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ यामुळे पाचव्या स्थानावर आला आहे.


भारतासमोरच्या अडचणीचे कारण म्हणजे आयसीसीने (ICC) भारताचे २ महत्त्वाचे गुण कमी केले आहेत. याशिवाय आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावला आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे.



काय आहे कारवाईचे नेमके कारण?


आयसीसीने टीम इंडियाला आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत दंड ठोठावला आहे. हे कलम किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकली तर खेळाडूंना मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो. भारताने २ षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड आणि २ गुण कापण्यात आले.


सेंच्युरियन कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे १६ गुण होते आणि गुणांची टक्केवारी ४४.४४ होती. परंतु ICC ने २ गुणांचा दंड ठोठावला, त्यानंतर भारताचे १४ गुण आणि गुणांची टक्केवारी ३८.८९ वर आली आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षाही खाली गेला आहे.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या