India Vs South Africa Test series : लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर आयसीसीची मोठी कारवाई; थेट सहाव्या स्थानावर गेला भारताचा संघ!

काय आहे कारण?


केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना (India Vs South Africa Test series) काल पार पडला. यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा भारत थेट पाचव्या स्थानावर घसरला. हा भारतासाठी पहिला मोठा धक्का होता. पण यानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे भारताची रवानगी गुणतालिकेत पाचव्या स्थानावरुनही खाली सहाव्या स्थानावर झाली आहे. तर सहाव्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ यामुळे पाचव्या स्थानावर आला आहे.


भारतासमोरच्या अडचणीचे कारण म्हणजे आयसीसीने (ICC) भारताचे २ महत्त्वाचे गुण कमी केले आहेत. याशिवाय आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावला आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे.



काय आहे कारवाईचे नेमके कारण?


आयसीसीने टीम इंडियाला आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत दंड ठोठावला आहे. हे कलम किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकली तर खेळाडूंना मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो. भारताने २ षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड आणि २ गुण कापण्यात आले.


सेंच्युरियन कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे १६ गुण होते आणि गुणांची टक्केवारी ४४.४४ होती. परंतु ICC ने २ गुणांचा दंड ठोठावला, त्यानंतर भारताचे १४ गुण आणि गुणांची टक्केवारी ३८.८९ वर आली आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षाही खाली गेला आहे.

Comments
Add Comment

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी