India Vs South Africa Test series : लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर आयसीसीची मोठी कारवाई; थेट सहाव्या स्थानावर गेला भारताचा संघ!

काय आहे कारण?


केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना (India Vs South Africa Test series) काल पार पडला. यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा भारत थेट पाचव्या स्थानावर घसरला. हा भारतासाठी पहिला मोठा धक्का होता. पण यानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे भारताची रवानगी गुणतालिकेत पाचव्या स्थानावरुनही खाली सहाव्या स्थानावर झाली आहे. तर सहाव्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ यामुळे पाचव्या स्थानावर आला आहे.


भारतासमोरच्या अडचणीचे कारण म्हणजे आयसीसीने (ICC) भारताचे २ महत्त्वाचे गुण कमी केले आहेत. याशिवाय आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावला आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे.



काय आहे कारवाईचे नेमके कारण?


आयसीसीने टीम इंडियाला आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत दंड ठोठावला आहे. हे कलम किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकली तर खेळाडूंना मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो. भारताने २ षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड आणि २ गुण कापण्यात आले.


सेंच्युरियन कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे १६ गुण होते आणि गुणांची टक्केवारी ४४.४४ होती. परंतु ICC ने २ गुणांचा दंड ठोठावला, त्यानंतर भारताचे १४ गुण आणि गुणांची टक्केवारी ३८.८९ वर आली आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षाही खाली गेला आहे.

Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात