IND Vs SA: दुसऱ्या कसोटीत बदलणार टीम इंडियाचे प्लेईंग ११, २-३ खेळाडूंची सुट्टी निश्चित

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेईंग ११मध्ये बदल होणार आहे. भारताच्या प्लेईंग ११मध्ये बदल होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे पहिल्या कसोटीत आफ्रिकेकडून एक डाव आणि ३२ धावांनी झालेला पराभव.यामुळे ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी आवेश खानला संघात सामील करण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियामध्ये तीन बदल पाहायला मिळू शकतात.


ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीत खेळणे निश्चित आहे. फिट नसल्याने जडेजाला पहिल्या कसोटीत प्लेईंग ११मध्ये जागा मिळाली नव्हती. मात्र तो आता प्लेईंग ११मध्ये आर अश्विनला रिप्लेस करणार आहे. आर अश्विन पहिल्या कसोटीत फलंदाज आणि गोलंदाजीत कमाल दाखवू शकला नव्हता. अश्विनने पहिल्या डावात ८ धावा केल्या तर दुसऱ्या डावात पहिल्या बॉलवरच खाते न खोलता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अश्विनने १९ षटके गोलंदाजी करताना केवळ १ विकेट मिळवला होता.


प्रसिद्ध कृष्णाला पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली होती. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने कृष्णाला दिलेली संधी यशस्वी टरली नाही. कृष्णाला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खूप झोडले. कृष्णाने २० षटकांत गोलंदाजीत ९३ धावा दिल्या आणि केवळ एक विकेट मिळवली. एवढा महागडा ठरल्यानंतर कृ्ष्णाला आता प्लेईंग ११मध्ये जागा दिली जाणार नाही. कृष्णाच्या स्थानावर आवेश खानला संधी मिळू शकते.



अय्यर आणि गिलची जागा कायम


पहिल्या कसोटीत फलंदाजीतील खराब कामगिरीनंतर अय्यर आणि गिल निशाण्यावर आहेत. गिल आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. १९ कसोटी खेळल्यानंतर गिलची फलंदाजीची सरासरी ३१ आहे जी सगळ्यात खराब आहे. याशिवाय टीम मॅनेजमेंट गिलवर विश्वास कायम ठेवणार आहे. दुसऱ्या कसोटीत तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करताना दिसेल.


अय्यर शॉर्ट गोलंदाजीविरुद्ध खराब परफॉर्मन्समुळे निशाण्यावर असतो. पहिल्या कसोटीत अय्यरने ३१ धावांची खेळी करत क्रीजवर टिकण्याचा प्रयत्न केला. अशातच टीम मॅनेजमेंट त्याला आणखी एक संधी देऊ शकतात.

Comments
Add Comment

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर