Health : तुम्ही तोंडावर चादर घेऊन झोपता का? तर हे जरूर वाचा

  111

मुंबई: थंडीचा मोसम(winter) सुरू आहे. अनेकजण थंडीचा जोर वाढला की ब्लँकेट अथवा रजई घेऊन झोपतात. काही जण तर रजई अथवा ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का अशी सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. रजई अथवा ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्याने आपला श्वास गुदमरू शकतो. तसेच रक्तसंचारावरही परिणाम होऊ शकतो. कारण चादर तोंडावर घेतल्यास शरीराला फ्रेश ऑक्सिजन मिळत नाही आणि खराब ऑक्सिजन शरीराच्या आतच राहतो.



तोंडावर चादर घेऊन का झोपू नये?


फुफ्फुसांना होऊ शकतो त्रास


तोंडावर चादर घेऊन झोपल्याने शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच श्वास कोंडणे अथवा हार्ट अॅटॅकसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. अनेक बाबतीत तर फुफ्फुसांचे आकुंचन होते. यामुळे थंडीच्या दिवसांत तोंडावर चादर ओढू नये.



त्वचेच्या समस्या वाढतात


आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या दिवसांत तोंडावर चादर घेऊन झोपल्या त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. रजई अथवा ब्लँकेटमधील खराब हवा त्वचेचा रंग काळवंडू शकते. यासाठी त्वचेवर रॅशेसची समस्या येऊ शकते. त्यामुळे लगेचच आपली ही सवय बदला.

कोणाला आहे सर्वाधिक धोका?


आरोग्य तज्ञांच्या मते ज्या लोकांना अस्थमा, सीओपीडी अथवा श्वासासंबंधी काही दुसरे आजार असतील तर त्यांनी चुकूनही तोंडावर चादर घेऊन झोपू नये. अशा लोकांसाठी ही सवय जीवघेणी ठरू शकते. तोंडावर चादर घेऊन झोपल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात. यामुळे अस्थमाचा अॅटॅक येण्याचीही भीती असते.
Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक