Health : तुम्ही तोंडावर चादर घेऊन झोपता का? तर हे जरूर वाचा

मुंबई: थंडीचा मोसम(winter) सुरू आहे. अनेकजण थंडीचा जोर वाढला की ब्लँकेट अथवा रजई घेऊन झोपतात. काही जण तर रजई अथवा ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का अशी सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. रजई अथवा ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्याने आपला श्वास गुदमरू शकतो. तसेच रक्तसंचारावरही परिणाम होऊ शकतो. कारण चादर तोंडावर घेतल्यास शरीराला फ्रेश ऑक्सिजन मिळत नाही आणि खराब ऑक्सिजन शरीराच्या आतच राहतो.



तोंडावर चादर घेऊन का झोपू नये?


फुफ्फुसांना होऊ शकतो त्रास


तोंडावर चादर घेऊन झोपल्याने शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच श्वास कोंडणे अथवा हार्ट अॅटॅकसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. अनेक बाबतीत तर फुफ्फुसांचे आकुंचन होते. यामुळे थंडीच्या दिवसांत तोंडावर चादर ओढू नये.



त्वचेच्या समस्या वाढतात


आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या दिवसांत तोंडावर चादर घेऊन झोपल्या त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. रजई अथवा ब्लँकेटमधील खराब हवा त्वचेचा रंग काळवंडू शकते. यासाठी त्वचेवर रॅशेसची समस्या येऊ शकते. त्यामुळे लगेचच आपली ही सवय बदला.

कोणाला आहे सर्वाधिक धोका?


आरोग्य तज्ञांच्या मते ज्या लोकांना अस्थमा, सीओपीडी अथवा श्वासासंबंधी काही दुसरे आजार असतील तर त्यांनी चुकूनही तोंडावर चादर घेऊन झोपू नये. अशा लोकांसाठी ही सवय जीवघेणी ठरू शकते. तोंडावर चादर घेऊन झोपल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात. यामुळे अस्थमाचा अॅटॅक येण्याचीही भीती असते.
Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका