Accident : डंपरची धडक बसल्यावर बसला लागली आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

  71

भोपाळ: मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडक बसल्यानंतर एका बसला लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास गुना-आरोन रस्त्यावर झाली. यावेळेस उलट्या दिशेने येणाऱ्या डंपर ट्रकची प्रवाशांना नेणाऱ्या बसला टक्कर बसली. यानंतर बस पलटी झाली आणि यात आग लागली.

या अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच त्यांनी आर्थिक मदतीचीही घोषणाकेली. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले, गुना येथून आरोन जाणाऱ्या बसमध्ये भीषण आग लागल्याने प्रवाशांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. या कठीण काळात आमचे सरकार मृत कुटुंबियांच्या पाठीशी आहे. माझ्या संवेदना त्यांच्या प्रती आहेत.


 


तपासाचे आदेश


मुख्यमंत्री म्हणाले, मी प्रशासनाला जखमी प्रवाशांवरील योग्य उपचार व्यवस्थेचे तसेच अपघाताप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. यामुळे भविष्यात होणाऱ्या अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.

मदतीची घोषणा


मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला बस अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४-४ लाख रूपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तर केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, घटनेची माहिती मिळताच मी लगेचच कलेक्टर आणि एसपी यांच्याशी बातचीत केली आणि त्यांना बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले.
Comments
Add Comment

भारत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

तडजोड करणार नसल्याची पंतप्रधान मोदी यांची ग्वाही शेतकरी, पशुपालक, मच्छीमारांच्या हिताला प्राधान्य

रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना 'या' राज्यांमध्ये मोफत बस प्रवास

तीन वर्षापासूनची परंपरा यंदाही कायम नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात शनिवार, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा

निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी वेळापत्रक घोषित

आवश्यकता भासल्यास ९ सप्टेंबर रोजी मतदान नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट नवी दिल्ली :

डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी वठणीवर आणणार! चीन दौऱ्याआधी दिल्लीत पुतिन-मोदी भेट होणार?

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा यावर्षी होणार असून, त्या दौऱ्याच्या तारखा सध्या अंतिम

पोस्टात मोठा बदल! १ सप्टेंबरपासून पोस्टाची 'ही' सेवा बंद होणार, नवीन नियमांचे फायदे-तोटे काय?

मुंबई : तुम्ही कधी विचार केलाय का, एका पत्रात किती भावना दडलेल्या असतात? एका क्षणाचा निरोप, आनंदाचे क्षण आणि

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर संतापले शशी थरुर, मोदींना सुचवला रामबाण उपाय

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया