सर्वसामान्यांना मिळणार २५ रूपये किलो दराने तांदूळ

  126

महागाईशी लढण्यासाठी केंद्र सरकारचे भारत ब्रँडला प्रोत्साहन


नवी दिल्ली : महागाईशी लढण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने(narendra modi)ice भारत ब्रँडला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त २५ रुपये 'किलो'ने तांदूळ विकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 'भारत' नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर 'भारत'चाच तांदूळ २५ रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने या तांदळाची योग्यरित्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या ब्रँडच्या दाळींची आणि पीठाचीही विक्री सुरु करण्यात आली आहे.


इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने भारत नावाच्या बँडचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल.


केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ २५ रुपये 'किलो'ने उपलब्ध करुन देत आहे. मात्र, तरिही बासमती तांदळाचे भाव ५० रुपये 'किलो'वर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करुन ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करुन भाव वाढवणाऱ्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या