सर्वसामान्यांना मिळणार २५ रूपये किलो दराने तांदूळ

महागाईशी लढण्यासाठी केंद्र सरकारचे भारत ब्रँडला प्रोत्साहन


नवी दिल्ली : महागाईशी लढण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने(narendra modi)ice भारत ब्रँडला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त २५ रुपये 'किलो'ने तांदूळ विकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 'भारत' नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर 'भारत'चाच तांदूळ २५ रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने या तांदळाची योग्यरित्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या ब्रँडच्या दाळींची आणि पीठाचीही विक्री सुरु करण्यात आली आहे.


इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने भारत नावाच्या बँडचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल.


केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ २५ रुपये 'किलो'ने उपलब्ध करुन देत आहे. मात्र, तरिही बासमती तांदळाचे भाव ५० रुपये 'किलो'वर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करुन ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करुन भाव वाढवणाऱ्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.

Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील