सर्वसामान्यांना मिळणार २५ रूपये किलो दराने तांदूळ

  117

महागाईशी लढण्यासाठी केंद्र सरकारचे भारत ब्रँडला प्रोत्साहन


नवी दिल्ली : महागाईशी लढण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने(narendra modi)ice भारत ब्रँडला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त २५ रुपये 'किलो'ने तांदूळ विकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 'भारत' नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर 'भारत'चाच तांदूळ २५ रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने या तांदळाची योग्यरित्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या ब्रँडच्या दाळींची आणि पीठाचीही विक्री सुरु करण्यात आली आहे.


इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने भारत नावाच्या बँडचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल.


केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ २५ रुपये 'किलो'ने उपलब्ध करुन देत आहे. मात्र, तरिही बासमती तांदळाचे भाव ५० रुपये 'किलो'वर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करुन ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करुन भाव वाढवणाऱ्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.

Comments
Add Comment

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली

देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू

कुल्लू : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांसह काही भागांमध्ये ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे