Ajit Pawar : अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल!

  82

अजित पवार सकाळीच पोहोचले कोल्हेंच्या मतदारसंघात


शिरुर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबाबत अनेक खुलासे करत त्यांच्या शिरुर मतदारसंघात त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले. त्यांच्या या लगेचच्या दौर्‍यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र, हा दौरा पूर्वनियोजित होता, त्याचा कालच्या वक्तव्याशी काही संबंध नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.


अजित पवार काल अमोल कोल्हे यांचं नाव न घेता म्हणाले होते की, त्यांचे चित्रपट चालत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत होता, ही गोष्ट त्यांनी आम्हाला बोलून दाखवली होती. त्यासाठी ते राजीनामा देणार होते. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जिवाचं रान केलं होतं. पण यावेळी आमचा उमेदवार उभा करुन त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं अजित पवार म्हणाले होते.


या वक्तव्यानंतर आज सकाळीच अजित पवार कोल्हेंच्या शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, 'आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही', अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. त्याचबरोबर, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना ती लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या