Ajit Pawar : अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल!

  79

अजित पवार सकाळीच पोहोचले कोल्हेंच्या मतदारसंघात


शिरुर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबाबत अनेक खुलासे करत त्यांच्या शिरुर मतदारसंघात त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले. त्यांच्या या लगेचच्या दौर्‍यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र, हा दौरा पूर्वनियोजित होता, त्याचा कालच्या वक्तव्याशी काही संबंध नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.


अजित पवार काल अमोल कोल्हे यांचं नाव न घेता म्हणाले होते की, त्यांचे चित्रपट चालत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत होता, ही गोष्ट त्यांनी आम्हाला बोलून दाखवली होती. त्यासाठी ते राजीनामा देणार होते. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जिवाचं रान केलं होतं. पण यावेळी आमचा उमेदवार उभा करुन त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं अजित पवार म्हणाले होते.


या वक्तव्यानंतर आज सकाळीच अजित पवार कोल्हेंच्या शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, 'आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही', अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. त्याचबरोबर, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना ती लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली