Ajit Pawar : अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल!

अजित पवार सकाळीच पोहोचले कोल्हेंच्या मतदारसंघात


शिरुर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबाबत अनेक खुलासे करत त्यांच्या शिरुर मतदारसंघात त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले. त्यांच्या या लगेचच्या दौर्‍यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र, हा दौरा पूर्वनियोजित होता, त्याचा कालच्या वक्तव्याशी काही संबंध नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.


अजित पवार काल अमोल कोल्हे यांचं नाव न घेता म्हणाले होते की, त्यांचे चित्रपट चालत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत होता, ही गोष्ट त्यांनी आम्हाला बोलून दाखवली होती. त्यासाठी ते राजीनामा देणार होते. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जिवाचं रान केलं होतं. पण यावेळी आमचा उमेदवार उभा करुन त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं अजित पवार म्हणाले होते.


या वक्तव्यानंतर आज सकाळीच अजित पवार कोल्हेंच्या शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, 'आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही', अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. त्याचबरोबर, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना ती लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री