VD18च्या सेटवर चौथ्यांदा वरूण धवन झाला दुखापतग्रस्त, शेअर केला फोटो

मुंबई: अभिनेता वरूण धवन(varun dhawan) सध्या दक्षिणेतील दिग्गज सिने दिग्दर्शक एटली कुमारचा अनटायटल्ड सिनेमा वीडी १८च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाची शूटिंग केरळमध्ये सुरू आहे. यातच शूटिंगदरम्यान अभिनेत्याच्या पायाला दुखापत झाली आहे. अभिनेत्याने दुखापतग्रस्त पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वरूण धवन वीडी १८च्या सेटवर चौथ्यांदा दुखापतग्रस्त झाला आहे.


वरूण धवनने नुकतीच इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याचा एक पाय खुर्चीवर दिसत आहे. या पायाला पट्टी बांधलेली आहे. व्हिडिओसह वरूणने कॅप्शनमध्ये लिहिले, शूटिंगवर आणखी एक दिवस...#vd18.



वरूणने ऑगस्ट महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरू केले होते. शूटिंग सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला सेटवर दुखापत झाली होती.



याआधीही झाला होता दुखापतग्रस्त


वीडी १८च्या शूटिंगदरम्यान सप्टेंबरमध्ये वरूण धवनला दुखापत झाली होती. सेटवर वरूणच्या एका पायाला दुखापत झाली होती. यानंतर त्याला बर्फाच्या पाण्याच्या थेरपीचा सल्ला देण्यात आला होता. त्यावेळेस त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत दुखापतीबाबत भाष्य केले होते. त्याने लिहिले होते, मला वाटते की शूटिंगदरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली आणि मला नाही माहीत की माझ्या पायाला कसे लागले.


वरूण धवन शेवटचा नितेश तिवारी यांचा सिनेमा बवालमध्ये दिसला होता. सिनेमात त्याच्यासोबत जान्हवी कपूर दिसली होती. वीडी १८शिवाय त्याच्याकडे वेब सीरिज सिटाडेल इंडिया पाईपलाईनमध्ये आहे. वीडी १८ बाबत बोलायचे झाल्यास सिनेमाच्या माध्यमातून तो पहिल्यांदा एटलीसोबत काम करत आहे. याआधी एटलीचा जवान हा सिनेमा आला होता. यात शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता.

Comments
Add Comment

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.