Rajasthan: ॲक्शन मोडमध्ये CM भजनलाल, अचानक पोहोचले SMS हॉस्पिटल, ३ कर्मचारी दिसले नाही तर केले निलंबित

  56

जयपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री बनल्यानंतर भजनलाल शर्मा(bhajanlal sharma) सातत्याने अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. यातच सोमवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलचे परीक्षण केले. जयपूरच्या शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवरून सीएमने अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश दिले. सोबतच सीएम म्हणाले आमच्या सरकारमध्ये काम आणि जबाबदारीबाबत कोणत्याही प्रकारचे चालढकल सहन केली जाणार नाही.


यावेळी सीएमच्या भेटीदरम्यान हॉस्पिटलमधील तीन कर्मचारी अनुपस्थित होते. या अनुपस्थित कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ नर्सिंग अधिकारी मुकेश बाबू, आलम अली खान, नर्सिंग अधिकारी मुकेश कुमार यांना निलंबित करण्यात आले.


सीएमनी ओटीएसमध्ये हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना म्हटले, सर्व डॉक्टर, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी इमानदारीने आपले काम करावे. सोबतच उशिरा येणारे आणि बेफिकीर राहणाऱ्या लोकांविरोधात कडक पावले उचलली जावीत.



स्वच्छता चांगली असावी


सीएमने डॉक्टरांना आदेश दिले की तातडीने रुग्णालय परिसराची स्वच्छता केली जावी. यासाठी बेपर्वाई करणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई केली जावी. रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा आणि योग्य ती देखभाल मिळावी. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छ आणि स्वस्थ वातावरण मिळावे.

Comments
Add Comment

मोदींच्या हस्ते तीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे एका विशेष समारंभात तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा

उत्तरकाशीत ढगफुटी, पूर, भूस्खलन; महाराष्ट्रातील एक महिला पर्यटक अद्याप बेपत्ता

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला आणि पूर

ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीचे भारताकडून स्वागत

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

पंतप्रधान आज कर्नाटकात, नागपूर-पुणेसह तीन वंदे भारत एक्सप्रेसना दाखवणार हिरवा झेंडा

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळूरु इथल्या

उत्तरकाशीच्या धारली आणि हर्षील गावाची परिस्थिती अजूनही बिकट! २५० लोकं अजूनही अडकलेले

उत्तरकाशी: उत्तरकाशीच्या धारली गावात झालेल्या आपत्तीनंतर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. धारलीकडे जाणारे सर्व

भारत निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत