मुंबईमध्ये ११ ठिकाणी ठेवलेत बॉम्ब, RBIला धमकीचा मेल, निर्मला सीतारमण यांच्याकडून राजीनाम्याची मागणी

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेला(reserve bank of india) मंगळवारी धमकीचा मेल मिळाला. यात आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


मेलमध्ये म्हटले आहे की मुंबईत आरबीआय कार्यालये, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकसहित ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहे. ईमेलच्या माध्यमातून आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास आणि कॅबिनेट मंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.



काय लिहिलेय धमकीच्या ईमेलमध्ये?


या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. ईमेलमध्ये म्हटले गेले की हे स्फोट मंगळवारी दुपारी दीड वाजता होणार होते. यानंतर एकच कल्लोळ झाला. पोलिसांनी सगळीकडे तपास केला मात्र काहीच संशयास्पद आढळले नाही. या संबंधामध्ये मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला