WFIचा वाद काही थांबेना, न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही - पुनिया

नवी दिल्ली: भारतीय कुस्तीपटू(indian wrestler) आणि कुस्ती महासंघ(WFI)यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. यातच रविवारी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची निवडणूक रद्द केली आणि नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले. सरकारचे म्हणणे आहे की ही निवडणूक नियमांच्या विरोधात आहे.


अध्यक्षपद निलंबित झाल्यानंतर संजय सिंहने म्हटले की ते याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलतील. न्यूज एजन्स एएनआयशी बोलताना संजय सिंह म्हणाले, ज्या मुलांना हा खेळ खेळायचा आहे त्यांचे भविष्य बर्बाद होत आहे.



बृज भूषण सिंह यांनी दिले स्पष्टीकरण


घाईघाईत ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे खासदार बृज भूषण सिंह यांनी सांगितले की गोंडामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन यासाठी करण्यात आले होते कारण इतक कोणताही महासंघ इतक्या कमी वेळात स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहमत नव्हता.



न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही


फेडरेशन रद्द झाल्याबाबत बोलताना साक्षी मलिक म्हणाली, तिला मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, याबाबतचा लिखित आदेश मिळालेला नाही. यातच पद्मश्री पुरस्कार परत करणाऱ्या बजरंग पुनियाने म्हटले की तो तोपर्यंत आपला पुरस्कार परत घेणार नाही जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही.


याबाबत बजरंग पुनिया म्हणाला, मी पद्मश्री परत घेणार नाही. न्याय मिळाल्यानंतरच यावर विचार करेन. कोणताही पुरस्कार हा आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा मोठा नाही.

Comments
Add Comment

Mount Everest Indian Climbers : एव्हरेस्ट सर केला, पण परतीचा प्रवास ठरला अखेरचा! दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) वर यशस्वी चढाई केल्यानंतर परतीच्या प्रवासात दोन भारतीय

गिधाडांना घरी बसवणारी जनता देशभक्तीच्या ‘हिट’ने झुरळांचाही बंदोबस्त करेल

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला कॉक्रोच जनता पार्टीला सरकार घाबरल्याचा दावा

Venezuela India Partnership : व्हेनेझुएला लवकरच भारताचा मोठा तेल पुरवठादार होणार, अमेरिकेने दिले संकेत

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ (Marco Rubio) लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी

PM Narendra Modi : कामात हलगर्जीपणा टाळा, मोदींचा मंत्र्यांना इशारा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) परदेश दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाची

'Vande Mataram' Mandatory in Madrasas : बंगाल सरकारचा मोठा निर्णय; आता बंगालमधील मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन अनिवार्य

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शुभेंदू सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बंगाल सरकारच्या अल्पसंख्याक कार्य आणि

Bengaluru Airport : बंगळूरु विमानतळावर मोठा अपघात टळला! लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाची धावपट्टीला धडक, १७९ प्रवासी थोडक्यात बचावले

बंगळुरू : दिल्लीहून बंगळूरुला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक