WFIचा वाद काही थांबेना, न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही - पुनिया

नवी दिल्ली: भारतीय कुस्तीपटू(indian wrestler) आणि कुस्ती महासंघ(WFI)यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. यातच रविवारी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची निवडणूक रद्द केली आणि नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले. सरकारचे म्हणणे आहे की ही निवडणूक नियमांच्या विरोधात आहे.


अध्यक्षपद निलंबित झाल्यानंतर संजय सिंहने म्हटले की ते याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलतील. न्यूज एजन्स एएनआयशी बोलताना संजय सिंह म्हणाले, ज्या मुलांना हा खेळ खेळायचा आहे त्यांचे भविष्य बर्बाद होत आहे.



बृज भूषण सिंह यांनी दिले स्पष्टीकरण


घाईघाईत ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे खासदार बृज भूषण सिंह यांनी सांगितले की गोंडामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन यासाठी करण्यात आले होते कारण इतक कोणताही महासंघ इतक्या कमी वेळात स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहमत नव्हता.



न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही


फेडरेशन रद्द झाल्याबाबत बोलताना साक्षी मलिक म्हणाली, तिला मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, याबाबतचा लिखित आदेश मिळालेला नाही. यातच पद्मश्री पुरस्कार परत करणाऱ्या बजरंग पुनियाने म्हटले की तो तोपर्यंत आपला पुरस्कार परत घेणार नाही जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही.


याबाबत बजरंग पुनिया म्हणाला, मी पद्मश्री परत घेणार नाही. न्याय मिळाल्यानंतरच यावर विचार करेन. कोणताही पुरस्कार हा आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा मोठा नाही.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च