WFIचा वाद काही थांबेना, न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही - पुनिया

नवी दिल्ली: भारतीय कुस्तीपटू(indian wrestler) आणि कुस्ती महासंघ(WFI)यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. यातच रविवारी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची निवडणूक रद्द केली आणि नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले. सरकारचे म्हणणे आहे की ही निवडणूक नियमांच्या विरोधात आहे.


अध्यक्षपद निलंबित झाल्यानंतर संजय सिंहने म्हटले की ते याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलतील. न्यूज एजन्स एएनआयशी बोलताना संजय सिंह म्हणाले, ज्या मुलांना हा खेळ खेळायचा आहे त्यांचे भविष्य बर्बाद होत आहे.



बृज भूषण सिंह यांनी दिले स्पष्टीकरण


घाईघाईत ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे खासदार बृज भूषण सिंह यांनी सांगितले की गोंडामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन यासाठी करण्यात आले होते कारण इतक कोणताही महासंघ इतक्या कमी वेळात स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहमत नव्हता.



न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही


फेडरेशन रद्द झाल्याबाबत बोलताना साक्षी मलिक म्हणाली, तिला मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, याबाबतचा लिखित आदेश मिळालेला नाही. यातच पद्मश्री पुरस्कार परत करणाऱ्या बजरंग पुनियाने म्हटले की तो तोपर्यंत आपला पुरस्कार परत घेणार नाही जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही.


याबाबत बजरंग पुनिया म्हणाला, मी पद्मश्री परत घेणार नाही. न्याय मिळाल्यानंतरच यावर विचार करेन. कोणताही पुरस्कार हा आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा मोठा नाही.

Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर