Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह निलंबित

Share

अध्यक्षांसह संपूर्ण संघावर केली निलंबनाची कारवाई

नवी दिल्ली : बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) आणि कुस्तीपटू (Wrestlers) यांच्यात सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्र सरकारने (Central Government) मोठी कारवाई केली आहे. नुकतीच कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यावर निलंबनाची (Supsension) कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय कुस्ती महासंघालाही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले आहे.

क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे की कुस्ती महासंघाने विद्यमान नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात, क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईने करण्यात आली आणि नियमांचे पालन केले गेले नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती, जो बृजभूषण सिंह यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आली आहे.

जवळपास वर्षभराने कुस्ती महासंघाची निवडणूक झाली होती. त्यात बृजभूषण सिंह यांच्या दबदबा पाहायला मिळाला. महत्त्वाच्या पदावर त्यांच्याच माणसांची नियुक्ती झाली होती. मात्र, घाईत घेतलेले काही निर्णय संघाला महागात पडले आहेत. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघाला निलंबित करताना संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांनाही स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत कुठलीही कारवाई करण्यालाही स्थगिती देण्यात आली आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago