Ajit Pawar : मी वयाच्या ६०व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली, काहीजणांनी मात्र ३८व्या वर्षीच...

बाकीच्यांचं खूप वर्षे ऐकलंत, आता माझं ऐका


अजितदादांचं नाव न घेता शरद पवारांवर टीकास्त्र


मुंबई : राष्ट्रवादी पक्षात (NCP) फूट पडल्यापासून अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु असतात. यातच आता अजितदादांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र उपसलं आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील (Baramati) नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य केलं.


अजित पवार म्हणाले, “माझे विचार अतिशय स्पष्ट असतात. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते. तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षाला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली.”


पुढे ते म्हणाले, “याआधी ४० वर्षांच्या आतच वेगळे निर्णय घेण्यात आले. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळा निर्णय घेतला. इथून पुढे फक्त माझं ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे. आता माझं ऐका,” अशी तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली.



माझा निर्णय योग्य म्हणून आमदार माझ्याबरोबर


“माझ्याबरोबर विधानसभेतील ५३ पैकी ४३ आमदार आहेत. देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे या दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंला दिला आहे. विधानपरिषदेतील ९ पैकी ६ आमदार माझ्याबरोबर आहेत. मी घेतलेला निर्णय योग्य असल्यानेच ही लोकं माझ्याबरोबर आली,” असं अजित पवार म्हणाले.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा