Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळूनही हार्दिक पांड्याच्या वाट्याला आलं 'हे दुखणं'!

कसोटी मालिकेसह हार्दिक पांड्या खेळणार नाही आयपीएल?


मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची नुकतीच आयपीएलसाठी (IPL) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदी निवड करण्यात आली. मात्र, मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही. मागील पाच वर्षे कर्णधारपदी असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) त्यांना पुन्हा एकदा कर्णधार म्हणून पाहायचे होते. त्यामुळे हार्दिक पांड्यावर अनेक चाहत्यांनी टीकाही केल्या. मात्र, हार्दिक पांड्याच्या तब्येतीबाबत आता एक वेगळीच अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे तो आयपीएल खेळणार नसल्याची शक्यता आहे.


हार्दिक पांड्याला विश्वचषक (World Cup) सामन्यांच्या वेळी खेळताना घोट्याला दुखापत झाली होती. यामुळे दोन सामन्यांनंतर उर्वरित विश्वचषक सामने त्याला खेळता आले नाहीत. त्याची दुखापत पूर्णपणे बरी न झाल्याने त्याला अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत देखील खेळता आले नाही. यानंतर आता याच दुखापतीमुळे तो आयपीएलही खेळू शकणार नसल्याचे समजत आहे.


हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकेत पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. खुद्द जय शहा यांनी असा आशावाद बोलून दाखवला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकाच काय हार्दिक पांड्या आयपीएल खेळण्याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.


मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड ऑफ करत आपल्या गोटात खेचलं होतं. १५ कोटींचे मानधन व कर्णधारपदाची अट घालून पांड्याने संघात वापसी केली होती. एकप्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. त्यांचे सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाले. मुंबई इंडियन्स व रोहित शर्माचे चाहते या पदबदलामुळे नाराज असताना हार्दिकच्या दुखापतीचा हा अपडेट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या