Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळूनही हार्दिक पांड्याच्या वाट्याला आलं 'हे दुखणं'!

  146

कसोटी मालिकेसह हार्दिक पांड्या खेळणार नाही आयपीएल?


मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची नुकतीच आयपीएलसाठी (IPL) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदी निवड करण्यात आली. मात्र, मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही. मागील पाच वर्षे कर्णधारपदी असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) त्यांना पुन्हा एकदा कर्णधार म्हणून पाहायचे होते. त्यामुळे हार्दिक पांड्यावर अनेक चाहत्यांनी टीकाही केल्या. मात्र, हार्दिक पांड्याच्या तब्येतीबाबत आता एक वेगळीच अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे तो आयपीएल खेळणार नसल्याची शक्यता आहे.


हार्दिक पांड्याला विश्वचषक (World Cup) सामन्यांच्या वेळी खेळताना घोट्याला दुखापत झाली होती. यामुळे दोन सामन्यांनंतर उर्वरित विश्वचषक सामने त्याला खेळता आले नाहीत. त्याची दुखापत पूर्णपणे बरी न झाल्याने त्याला अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत देखील खेळता आले नाही. यानंतर आता याच दुखापतीमुळे तो आयपीएलही खेळू शकणार नसल्याचे समजत आहे.


हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकेत पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. खुद्द जय शहा यांनी असा आशावाद बोलून दाखवला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकाच काय हार्दिक पांड्या आयपीएल खेळण्याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.


मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड ऑफ करत आपल्या गोटात खेचलं होतं. १५ कोटींचे मानधन व कर्णधारपदाची अट घालून पांड्याने संघात वापसी केली होती. एकप्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. त्यांचे सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाले. मुंबई इंडियन्स व रोहित शर्माचे चाहते या पदबदलामुळे नाराज असताना हार्दिकच्या दुखापतीचा हा अपडेट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )