Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळूनही हार्दिक पांड्याच्या वाट्याला आलं 'हे दुखणं'!

कसोटी मालिकेसह हार्दिक पांड्या खेळणार नाही आयपीएल?


मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची नुकतीच आयपीएलसाठी (IPL) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदी निवड करण्यात आली. मात्र, मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही. मागील पाच वर्षे कर्णधारपदी असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) त्यांना पुन्हा एकदा कर्णधार म्हणून पाहायचे होते. त्यामुळे हार्दिक पांड्यावर अनेक चाहत्यांनी टीकाही केल्या. मात्र, हार्दिक पांड्याच्या तब्येतीबाबत आता एक वेगळीच अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे तो आयपीएल खेळणार नसल्याची शक्यता आहे.


हार्दिक पांड्याला विश्वचषक (World Cup) सामन्यांच्या वेळी खेळताना घोट्याला दुखापत झाली होती. यामुळे दोन सामन्यांनंतर उर्वरित विश्वचषक सामने त्याला खेळता आले नाहीत. त्याची दुखापत पूर्णपणे बरी न झाल्याने त्याला अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत देखील खेळता आले नाही. यानंतर आता याच दुखापतीमुळे तो आयपीएलही खेळू शकणार नसल्याचे समजत आहे.


हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकेत पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. खुद्द जय शहा यांनी असा आशावाद बोलून दाखवला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकाच काय हार्दिक पांड्या आयपीएल खेळण्याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.


मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड ऑफ करत आपल्या गोटात खेचलं होतं. १५ कोटींचे मानधन व कर्णधारपदाची अट घालून पांड्याने संघात वापसी केली होती. एकप्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. त्यांचे सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाले. मुंबई इंडियन्स व रोहित शर्माचे चाहते या पदबदलामुळे नाराज असताना हार्दिकच्या दुखापतीचा हा अपडेट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर