सोलापूर : गेल्या काही दिवसांत अपघातांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी येथे एसटी बस (ST Bus) आणि दुचाकीचा (Bike) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृत तरूण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडीखाली चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पुण्याहून धाराशिवकडे निघालेल्या एसटी बसचा आणि धाराशिवहून बार्शीकडे निघालेल्या दुचाकीचा तांदुळवाडी येथे अपघात झाला. यातील दुचाकीवर धाराशिवमधील तीन मित्र होते. एसटी बस आणि दुचाकीची झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तीनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास ५० फूटांपर्यंत फरफटत गेले.
कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला आले. दरम्यान, बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…