Solapur Accident : एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक; तिघांचा चिरडून मृत्यू

बार्शी-धाराशिव मार्गावर घडला भीषण अपघात


सोलापूर : गेल्या काही दिवसांत अपघातांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी येथे एसटी बस (ST Bus) आणि दुचाकीचा (Bike) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृत तरूण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडीखाली चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.


पुण्याहून धाराशिवकडे निघालेल्या एसटी बसचा आणि धाराशिवहून बार्शीकडे निघालेल्या दुचाकीचा तांदुळवाडी येथे अपघात झाला. यातील दुचाकीवर धाराशिवमधील तीन मित्र होते. एसटी बस आणि दुचाकीची झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तीनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास ५० फूटांपर्यंत फरफटत गेले.


कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला आले. दरम्यान, बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

IMD Weather Update : चिंता वाढली! मोथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच 'कमी दाबाचा पट्टा' निर्माण; पुढचे ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्रासाठी IMDचा नवा इशारा!

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD - Indian Meteorological Department) देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Police Nameplates : 'खाकी'त 'आडनावा'ची ओळख संपणार? बीडच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर जिल्ह्यांमध्येही स्वागत; लवकरच पोलीस नेमप्लेटवरून आडनाव 'गायब'!

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या वर्दीवरील (Police Uniform) खाकी गणवेश (Khaki Uniform) आणि त्यावर असलेली नावपट्टी ही सर्वसामान्य ओळख

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात