Solapur Accident : एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक; तिघांचा चिरडून मृत्यू

  100

बार्शी-धाराशिव मार्गावर घडला भीषण अपघात


सोलापूर : गेल्या काही दिवसांत अपघातांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी येथे एसटी बस (ST Bus) आणि दुचाकीचा (Bike) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृत तरूण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडीखाली चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.


पुण्याहून धाराशिवकडे निघालेल्या एसटी बसचा आणि धाराशिवहून बार्शीकडे निघालेल्या दुचाकीचा तांदुळवाडी येथे अपघात झाला. यातील दुचाकीवर धाराशिवमधील तीन मित्र होते. एसटी बस आणि दुचाकीची झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तीनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास ५० फूटांपर्यंत फरफटत गेले.


कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला आले. दरम्यान, बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या