Murder : चिकनवरून झाला वाद, लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

जयपूर: राजस्थानच्या(rajasthan) अलवरमधील तिजारा भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या मोठ्या भावाची हत्या(murder) केली. खरंतर, मोठा भाऊ चिकन घेऊन आला होता. त्यावेळेस त्याने लहान भावाला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. छोट्या भावाने चाकूने मोठ्या भावावर हल्ला केला. यावेळेस लहान भावाने चाकूने धारदार वार केले.


मिळालेल्या माहितीनुसार, तिजारा ठाणेंतर्गत शाबाद गावातील निवसी किशोरी लालची तीन मुले होती. तीनही मजुरी करून घर चालवत होते. यातील एकजण चिकन घेऊन घाला. भुड्डनने लहान भाऊ जगदीशला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून जगदीश नाराज झाला आणि त्याने चिकन बनवण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.


दोघांच्या भांडणादरम्यान आई तेथे भांडण सोडवण्यासाठी आली मात्र दोघांनी तिला धक्का दिला. यांच्या घरातील आरडाओरडा ऐकून गावातील लोक जमले आणि दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद वाढत गेला. या दरम्यान, जगदीशने घरात ठेवलेला चाकू घेऊन भड्डनच्या पोटात घुसवला. जगदीशने अनेक वेळा चाकूने हल्ला केला. यानंतर जगदीश त्या ठिकाणाहून पळून गेला.


या दरम्यान कुटुंबियांनी भुड्डनला तातडीने सरकारी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी अलवर येथे नेण्यास सांगितले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.



गावकऱ्यांच्या सूचनेनंतर पोहोचले पोलीस


गावकऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह हाती घेत पोस्टमार्टेम केले. तीनही भाऊ मजुरी करत होते. यावेळेस चिकन बनवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. कुटुंबियांनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र याचवेळेस जगदीशने आपल्या भावावर चाकूने हल्ला केला.

Comments
Add Comment

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

26/11 Mumbai Attack Hafiz Saeed : हाफिज सईदसह ६ पाकिस्तानी आरोपींवर भारतात ‘इन-अबसेंटिया’ खटला; कायदेशीर प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : २००८ च्या मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला जवळपास १८ वर्षे उलटून गेल्यानंतर भारताने या

Jantar Mantar Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी; सुप्रीम कोर्टाकडून ५ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना

नवी दिल्ली : जंतरमंतरसह देशातील विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि

National Teachers Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण

Viral News : नवरी नटून-थटून मंडपात उभी होती, अचानक घडला असा प्रकार अन् थेट डॉक्टर बनून उपचारासाठी धावली

केरळ : केरळमधील कन्नूर (Kannur) येथे एका नवविवाहित डॉक्टरने आपल्या लग्नाच्या आनंदातही डॉक्टर (Doctor) म्हणून असलेले

Bihar Accident : क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं! वाढदिवसाच्या कार्यक्रमात बस काळ बनून आली; बिहारमध्ये भयानक अपघात घडला

बिहार : बिहारमधील बेतिया येथे मुलाच्या सहाव्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमात