IND Vs SA: भारताचे द. आफ्रिकेसमोर २९७ धावांचे आव्हान, संजू सॅमसनचे शतक

  54

 

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या स्थानावर आलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने ११४ बॉलमध्ये १०८ धावा ठोकल्या. तर तिलक वर्मानेही ५२ धावांची खेळी केली.

भारताची सुरूवात थोडी डळमळीत झाली. ३४ धावसंख्या असताना भारताचा पहिला विकेट पडला. साई सुदर्शन १० धावा करून बाद झाला. तर रजत पाटीदार २२ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्याने तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या संजू सॅमसनने १०८ धावा तडकावल्या. त्याने आपल्या या खेळीदरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार लगावले.

कर्णधार केएल राहुलने या सामन्यात २१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने ७७ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. रिंकू सिंहने ३८ धावांची खेळी केली. यासोबतच भारताने निर्धारित ५० षटकांत २९६ धावा केल्या.

आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सने ३ विकेट घेतले. तर नांद्रे बर्गरने २ धावा केल्या. लिझाद विलियम्स, विआन मुल्दर, केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार