IND Vs SA: भारताचे द. आफ्रिकेसमोर २९७ धावांचे आव्हान, संजू सॅमसनचे शतक

 

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या स्थानावर आलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने ११४ बॉलमध्ये १०८ धावा ठोकल्या. तर तिलक वर्मानेही ५२ धावांची खेळी केली.

भारताची सुरूवात थोडी डळमळीत झाली. ३४ धावसंख्या असताना भारताचा पहिला विकेट पडला. साई सुदर्शन १० धावा करून बाद झाला. तर रजत पाटीदार २२ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्याने तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या संजू सॅमसनने १०८ धावा तडकावल्या. त्याने आपल्या या खेळीदरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार लगावले.

कर्णधार केएल राहुलने या सामन्यात २१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने ७७ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. रिंकू सिंहने ३८ धावांची खेळी केली. यासोबतच भारताने निर्धारित ५० षटकांत २९६ धावा केल्या.

आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सने ३ विकेट घेतले. तर नांद्रे बर्गरने २ धावा केल्या. लिझाद विलियम्स, विआन मुल्दर, केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.