IND Vs SA: भारताचे द. आफ्रिकेसमोर २९७ धावांचे आव्हान, संजू सॅमसनचे शतक

 

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या स्थानावर आलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने ११४ बॉलमध्ये १०८ धावा ठोकल्या. तर तिलक वर्मानेही ५२ धावांची खेळी केली.

भारताची सुरूवात थोडी डळमळीत झाली. ३४ धावसंख्या असताना भारताचा पहिला विकेट पडला. साई सुदर्शन १० धावा करून बाद झाला. तर रजत पाटीदार २२ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्याने तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या संजू सॅमसनने १०८ धावा तडकावल्या. त्याने आपल्या या खेळीदरम्यान ६ चौकार आणि ३ षटकार लगावले.

कर्णधार केएल राहुलने या सामन्यात २१ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने ७७ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. रिंकू सिंहने ३८ धावांची खेळी केली. यासोबतच भारताने निर्धारित ५० षटकांत २९६ धावा केल्या.

आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सने ३ विकेट घेतले. तर नांद्रे बर्गरने २ धावा केल्या. लिझाद विलियम्स, विआन मुल्दर, केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड