४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना देऊ नये कफ सिरप, DCGIने दिला इशारा

नवी दिल्ली: भारताचे औषध नियामक DCGIने चार वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी सर्दी आणि खोकल्यासाठी कफ सिरपच्या वापरावर बंदी घालताना इशारा दिला आहे. DCGIने १८ डिसेंबरला सर्व राज्यांना एक पत्र लिहित दोन औषधे क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनाईलफ्राईनच्या कॉकटेलचा वापर करून बनवलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबलिंग यानुसार करण्यास सांगितले आहे.


खरंतर, या दोन औषधांच्या मिश्रणाने तयार केलेले सिरप अथवा गोळ्यांचा वापर सामान्य सर्दीच्या लक्षणांवरील उपचारासाठी केला जातो. या बंदी घातलेल्या सिरपच्या वापरामुळे जगभरातील १४१ मुलांचा मृत्यू झाल्याने ही बाब समर आली आहे. सर्व औषध कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत की या दोन औषधांच्या वापराने तयार झालेल्या सिरपचे लेबलिंग तातडीने अपडेट केले जावे.



कोकाटे समितीच्या शिफारशीच्या आधारावर निर्णय


राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, क्लोरफेनिरामाईन मॅलेट आयपी २ एमजी + फिनाईलफ्राईन एचसीआय आयपी ४ एमजी ड्रॉप/ एमएलच्या फिक्स डोजच्या कॉम्बिनेशनला कोकाटे समितीद्वारे तर्कसंगत घोषित करण्यात आला आहे आणि समितीच्या शिफारशीच्या आधारावर या कार्यालयाने १८ महिन्यांच्या नितीगत निर्णयांतर्गत १७ जुलैला पत्र जारी केले आहे.



कंपन्यांना पॅकेजिंगवर इशारा लिहिण्याचे आदेश


पत्रात म्हटले आहे की, समितीने शिफारस केली आहे की एफडीसीचा वापर ४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये केला जाऊ नये आणि त्यानुसार कंपन्यांनी लेबल आणि पॅकेज इन्सर्टवर यासंबंधीचा इशारा देणारा उल्लेख करावा असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव