४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना देऊ नये कफ सिरप, DCGIने दिला इशारा

नवी दिल्ली: भारताचे औषध नियामक DCGIने चार वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी सर्दी आणि खोकल्यासाठी कफ सिरपच्या वापरावर बंदी घालताना इशारा दिला आहे. DCGIने १८ डिसेंबरला सर्व राज्यांना एक पत्र लिहित दोन औषधे क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनाईलफ्राईनच्या कॉकटेलचा वापर करून बनवलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबलिंग यानुसार करण्यास सांगितले आहे.


खरंतर, या दोन औषधांच्या मिश्रणाने तयार केलेले सिरप अथवा गोळ्यांचा वापर सामान्य सर्दीच्या लक्षणांवरील उपचारासाठी केला जातो. या बंदी घातलेल्या सिरपच्या वापरामुळे जगभरातील १४१ मुलांचा मृत्यू झाल्याने ही बाब समर आली आहे. सर्व औषध कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत की या दोन औषधांच्या वापराने तयार झालेल्या सिरपचे लेबलिंग तातडीने अपडेट केले जावे.



कोकाटे समितीच्या शिफारशीच्या आधारावर निर्णय


राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, क्लोरफेनिरामाईन मॅलेट आयपी २ एमजी + फिनाईलफ्राईन एचसीआय आयपी ४ एमजी ड्रॉप/ एमएलच्या फिक्स डोजच्या कॉम्बिनेशनला कोकाटे समितीद्वारे तर्कसंगत घोषित करण्यात आला आहे आणि समितीच्या शिफारशीच्या आधारावर या कार्यालयाने १८ महिन्यांच्या नितीगत निर्णयांतर्गत १७ जुलैला पत्र जारी केले आहे.



कंपन्यांना पॅकेजिंगवर इशारा लिहिण्याचे आदेश


पत्रात म्हटले आहे की, समितीने शिफारस केली आहे की एफडीसीचा वापर ४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये केला जाऊ नये आणि त्यानुसार कंपन्यांनी लेबल आणि पॅकेज इन्सर्टवर यासंबंधीचा इशारा देणारा उल्लेख करावा असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी