Rajasthan: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारला अपघात, दुसऱ्या गाडीने सीएमला केले रवाना

Share

जयपूर: राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा(bhajanlal sharma) मंगळवारी भरतपूरला आले होते. भरतपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत आहे. याठिकाणी ते आपल्या खाजगी निवासस्थानी गेले. तेथे कुटुंबियांना भेटून ते भरतपूरमधील सर्किट हाऊस पोहोचले. भरतपूरच्या सर्किट हाऊसमध्ये कार्यकर्ते तसेच विविध संघटनांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री संध्याकाळी साडेसात वाजता गिरीराज जीच्या दर्शनसाठी भरतपूर येथून रवाना झाला.े मात्र गोवर्धन पोहोचण्याआधी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारचे चाक रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात गेले.

मुख्यमंत्री ज्या बाजूला बसले होते तेथील कारचा भाग एकदम खाली आला आणि गाडी बंद झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने दुसऱ्या गाडीने रवाना करण्यात आले. डींग जिल्हा पोलीस अधीक्षक बृजेश ज्योती उपाध्यक्ष यांनी सांगितले की यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

मुख्यमंत्री बनल्यानंतर मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पहिल्यांदा आपल्या घरी भरतपूर दौऱ्यावर गेले होते. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे भरतपूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्ह्याची सीमा कमालपुरा येथून ते भरतपूरपर्यंत प्रत्येक पावलावर त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. भरतपूरमध्ये भजनलाल शर्मा यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

9 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

10 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

11 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

11 hours ago