जनसेवा हीच ईश्वर भक्ती मानत सत्यशोधक शेतकरी सभेचा मंत्रालयवर पायी विराट मोर्चा

नाशिक : सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या माध्यमातून नंदुरबार ते मुंबई मंत्रालय असा आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी पायी बिराट मोर्चा काढण्यात आला.



हा मोर्चा ७ डिसेंबर २०२३ पासून नंदुरबार या ठिकाणाहून पायी निघाला. मोर्चाचे आयोजन जरी राजकीय हेतून झाले असले तरी त्यामध्ये सहभागी असलेला जनजाती समूहाची सेवा करण्याच्या हेतूने १७ डिसेंबर रोजी हा मोर्चा आडगाव नाशिक येथे आला. या मोर्चातील पायी चालणाऱ्या जनजाती बांधवांची प्रकृती खराब झाली. असे समजतात राष्ट्रीय विकास मंडळ, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद व्यासपीठ व अनामिक या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळेस ४ हजार पेक्षा जास्त जनजाती बांधवांची आरोग्य तपासणी केली. त्यांना गोळ्या, औषधे व जखमेवर मलम पट्टी करण्यात आली.यावेळी- योगेश शिंदे, सह प्रमुख अनिल पाटील, अनामिक चे महेंद्र भोये, विजय रणपीसे, अनुलोम चे दत्ता मिसाळ, अमोल गायकवाड व आयुर्वेद सेवासंघ चे डॉ. रश्मी भुरे, डॉ. सोनल ठाकरे, शुभदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य