पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी सुपा येथील खैरे व शिरापूर(ता.दौंड) येथील होलम काठीने शिखराला काठी टेकविण्याचा मान घेतला. यावेळी सात ते आठ प्रासादिक काठ्या सहभागी होत्या.यावेळी भाविकांनी जल्लोष करित भंडा-याची उधळण करीत गडावर काठीची मंदीर प्रदक्षिणा केली.पौष पौर्णिमेनिमित्त सुप्याच्या खैरे व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील काठी परंपरेनुसार शिखराला काठी टेकविण्यासाठी येते. आज सकाळी वाजत गाजत काठी गडावर आली. काठीप्रमुख शहाजी खैरे व भाविक होते. दुपारी साडेबारा वाजता खैरे व होलम यांची काठी टेकविण्याचा मान पार पडला. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा घेण्यात आली.भाविकांनी भंडारा उधळून जल्लोष करित प्रदक्षिणा पुर्ण केली. तांबडे-पांढरे निशान हे या काठीची ओळख आहे. तांबडे-पांढरे वस्त्रांनी काठी सजविण्यात आली होती.गावातही अनेक ठिकाणी काठीने मानाचे कार्यक्रम घेतले. पौष पौर्णिमेला काठी आणण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. खंडोबा-म्हाळसाच्या लग्नाचा सोहळ्यानिमित्त दुस-या दिवशी काठी टेकविण्याचा मानाचा कार्यक्रम परंपरेनुसार चालत आला आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा