Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या नव्या वचननाम्यावर टीका करताना उदय सामंत यांनी 'जुन्या आश्वासनांचे काय झाले?' असा परखड सवाल उपस्थित करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.



मुंबईकरांची २५ वर्षे वाया गेली?


गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे. तरीही मुंबईकरांना हक्काची घरे आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. "आता दोन्ही ठाकरे एकत्र आले असून त्यांनी नवीन वचननामा जाहीर केला आहे, मात्र हादेखील केवळ कागदावरच राहील," असा अविश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा कायापालट करायचा असेल, तर महायुतीचा महापौर बसवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


"महापौर मराठीच होणार" 


मराठी माणसाला मुंबईत पुन्हा सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या "मुंबईचा महापौर मराठीच होईल" या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. राज ठाकरे यांनीही मराठी महापौराची मागणी केल्यास त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र ही जबाबदारी केवळ महायुतीचे नगरसेवक आणि महापौरच समर्थपणे पेलू शकतात, असे मत त्यांनी मांडले.


राज ठाकरेंच्या 'खंजीर' प्रकरणावर भाष्य


यावेळी उदय सामंत यांनी जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "आम्ही पूर्वीच भविष्यवाणी केली होती की उद्धव ठाकरे हे मनसेला केवळ ५०-५५ जागा देऊन राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि प्रत्यक्षात तसेच घडले," असे ते म्हणाले. या दगाफटक्यामुळे राज ठाकरेंच्या मनात आजही वेदना असतील, पण त्या ते उघडपणे बोलू शकत नाहीत, असे सूचक विधानही त्यांनी केले.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व