Raj Thackeray : धारावीबाबत उद्धव ठाकरेंना आता कशी काय जाग आली?

मविआच्या मोर्चावर राज ठाकरेंचा टोमणा


मुंबई : धारावी येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे (Dharavi redevelopment) काम अदानी समूहाला (Adani group) देण्यात आले आहे. मात्र धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे गटासह मविआने (MVA) विरोध दर्शवला आहे. यासाठी त्यांनी मोर्चादेखील काढला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मविआच्या या मोर्चाला टोमणा मारला आहे. 'जाहिरात येऊन ८-१० महिने झाले, मग उद्धव ठाकरेंना आता का जाग आली?', असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं.



सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का?


राज ठाकरे म्हणाले, जाहिरात येऊन ८-१० महिने झाले मग आज मोर्चा का काढला? सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला? १० महिन्यांनी जागे झालेल्या महाविकास आघाडीने धारावीत नेमके काय होणार हा प्रश्न विचारला का? मोर्चाचे दबाव आणून सेटलमेंट करायचे आहेत का हे मविआ नेत्यांना विचारा, असं राज ठाकरे म्हणाले.



सर्व मोठे प्रकल्प अदानींनाच कसे मिळतात?


तसेच सर्व मोठे प्रकल्प अदानींनाच कसे मिळतात यावरही राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, मुंबईत जो मोठा प्रकल्प येतो तो परस्पर अदानींना का दिला जातो? अदानींकडे असं काय आहे, म्हणजे विमानतळ, कोळसा, खाणी यासारख्या बाकीच्या गोष्टी तेच हाताळू शकतात? एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी टाटांसारख्या अनेक बड्या कंपन्यांकडून तुम्ही टेंडर मागवायला हवी होती. डिझाईन मागवायला हवे होते. तिथे नेमके काय होणार हे कळायला हवे होते पण हे झाले नाही. मी बीडीडी चाळीच्या इथं पाहणीला गेलो होतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर मी विचारलं होतं, तिथे शाळा किती, रस्ते कसे होणार, किती इमारती होणार, टाऊन प्लॅनिंग काय आहे हे सांगावं लागते. एक मोठा भाग घेतला आणि अदानींना दिला असं थोडी असते, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.


Comments
Add Comment

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण