Delhi:दिल्ली दारू घोटाळा, अरविंद केजरीवालना ED ने पुन्हा पाठवली नोटीस

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचनालयाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात २१ डिसेंबरला सादर होण्याचे आदेश दिले आहेत.


याआधी २ नोव्हेंबरला अरविंद केजरीवालला चौकशीसाठी ईडीने नोटीस पाठवली होती. मात्र नोटीस बेकायदेशीर सांगत परत घेण्याची मागणी केली होती. केजरीवाल या दिवशी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी रोड शोमध्ये सामील झाले होते.



विपश्यना ध्यानमध्ये सामील होण्याचा कार्यक्रम


अरविंद केजरीवाल यांना समन्स अशा वेळेस पाठवण्यात आले आहे जेव्हा ते विपश्यना केंद्रात जाणार आहेत. न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की केजरीवाल १० दिवसांच्या विपश्यना ध्यान कार्यक्रमात सामील होतील.


अधिकाऱ्यांनी सांगितले की केजरीवाल दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रीय राजधानीसाठी रवाना होतील. मुख्यमंत्री दीर्घकाळापासून विपश्यनेचा अभ्यास करत आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून बंगळुरू आणि जयपूरसह अनेक ठिकाणी गेले आहेत.



कोणत्या आप नेत्यांना आजपर्यंत अटक?


मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह न्यायालयीन कोठडीत आहेत.

Comments
Add Comment

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी