कांदा लागवडीला वीज वितरण यंत्रणेच्या दुरूस्तीचे ग्रहण

Share

पावसाळ्यापूर्वीची दुरूस्ती केवळ फार्स

कंधाणे : दुष्काळाची दाहकता, पाठीशी गारपीठीची स्मृती अश्या कटू आठवणींना बासनात गुंडाळून बागलाणच्या पश्चिम पट्टयातील बळीराजा सध्या रब्बी हंगामातील कांदा पिकाच्या लागवडीत व्यस्त झाला आहे. आधीच मजूर व कांदा रोपांची टंचाईचा ससेमिरा पाठीशी असताना सध्या या भागात सटाणा सबस्टेशनच्या ३३ केव्ही उच्च विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीच्या नावाखाली तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने बळीराजांना कांदा पिकाला पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठराविक दिवसांच्या अवधीतच इमर्जन्सी लोडशेडिंग व विद्युत तारा दुरूस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा अचानक खंडित केला जात आहे. विद्यूत वितरण कंपनीकडून पावसाळयापुर्वी मे महिन्याच्या मध्यान्हाला विज दुरूस्तीच्या नावाखाली कामे केली जातात. दुरूस्तीच्या नावाखाली लाखोंची बिले ठेकेदारांना वितरीत केली जात असताना अचानक विद्युत दुरूस्ती निघतेच कशी? असा संतप्त सवाल बळीराजांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पावसाळ्यात दुरूस्तीच्या नावाखाली जाहिरात बाजी करून वीज कंपनीकडून दुरूस्ती केली जाते. तरीही ब-याचदा विद्युत पुरवठा सुरळीत असतांना अचानक दुरूस्तीच्या नावाखाली व इर्मजन्सी लोडशेडिंगच्या नावाने विद्यूत पुरवठा खंडित करून या भागातील बळीराजांना विद्युत वितरण कंपनीकडून वेठीस धरले जात असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात केले गेलेली दुरूस्तीची कामे निव्वळ औपचारिकता व फार्स तर नाही ना? सध्या परिसरात कांदा लागवड कामाने वेग घेतला असून भविष्यातील दुष्काळाची चाहूल आधीच जाणवू लागल्याने मिळेल त्या परिस्थितीशी दोन हात करत बळीराजांकडून कांदा लागवड केली जात आहे.

मागे या भागात अवेळी झालेल्या पावसामुळे कांदा रोप खराब झाले असल्याने एकरीवर होणारी लागवड गुंठ्ठयावर येवून ठेपल्याने कांदा रोप मिळविण्यासाठी बळीराजांवर दाहीदिशा होण्याची वेळ येवून ठेपली आहे. परिस्थतीचे गांभीर्य ओळखून ज्यांच्याकडे कांदा रोप उपलब्ध आहेत ते सोन्याच्या दराने कांदा रोप विक्री करतांना दिसत आहेत.

सध्या परिसरात गुलाबी थंडीची चाहूल वाढली असून विद्यूत वितरण कंपनीकडून शेतीसाठी राबविण्यात येणारे भारनियमन अतिशय चुकीच्या पध्दतीनुसार राबविले जात असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना रात्रीच्या थंडीत उभे रहावे लागत आहे. त्यातच दिवसा थ्री फेज सप्लाय सुरू असतांना दुरूस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रूपयांची बिले काढली जात असतांना अचानक बिघाड होतोच कसा? की मग दुरूस्ती केवळ कागदावरच केली जाते. असा सवाल आता विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

5 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

6 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

6 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

6 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

7 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

7 hours ago