IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय चुकला; ११६ धावांतच झाले गार!

भारतासमोर आता केवळ ११७ धावांचे आव्हान


जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (India vs South Africa 1st ODI) यजमान कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताचे फलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) व आवेश खान (Avesh Khan) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर दबदबा राखला. अर्शदीपने पाच विकेट्स घेतल्या आणि आवेशने चार विकेट्स घेत आफ्रिकेचा डाव ११६ धावांवर गुंडाळला.


के.एल. राहुल (K. L. Rahul) भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्स आणि डी जॉर्जी ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली होती. पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारताला चांगली सुरुवात करून दिली. अर्शदीपने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड केले. हेंड्रिक्सला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी-व्हॅन-डर डुसेनला पायचीत बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र, अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली.


५२ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी अफलातून गोलंदाजी करताना प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. अर्शदीपप्रमाणे ११ व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, तिसऱ्या चेंडूवर अँडिले फेहलुकवायोने बचाव केल्याने त्याला विकेट मिळवता आली नाही.


दक्षिण आफ्रिकेला १३व्या षटकात ५८ धावांवर सातवा धक्का बसला. आवेश खानने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. मिलरला फक्त दोन धावा करता आल्या. मिलर बाद होताच केशव महाराजलाही फारसे काही करता आले नाही. ऋतुराज गायकवाडकरवी तो झेलबाद झाला. अर्शदीपने २६व्या षटकात पाचवी विकेट घेतली. तर, कुलदीपने शेवटची विकेट घेतली. आवेश पाच विकेट्स घेऊ शकला नाही. भारतीय गोलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकन संघ केवळ ११६ धावांची कामगिरी करु शकला आहे. भारत या सामन्यात आता आपली जादू दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव