IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय चुकला; ११६ धावांतच झाले गार!

भारतासमोर आता केवळ ११७ धावांचे आव्हान


जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (India vs South Africa 1st ODI) यजमान कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताचे फलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) व आवेश खान (Avesh Khan) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर दबदबा राखला. अर्शदीपने पाच विकेट्स घेतल्या आणि आवेशने चार विकेट्स घेत आफ्रिकेचा डाव ११६ धावांवर गुंडाळला.


के.एल. राहुल (K. L. Rahul) भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्स आणि डी जॉर्जी ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली होती. पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारताला चांगली सुरुवात करून दिली. अर्शदीपने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड केले. हेंड्रिक्सला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी-व्हॅन-डर डुसेनला पायचीत बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र, अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली.


५२ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी अफलातून गोलंदाजी करताना प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. अर्शदीपप्रमाणे ११ व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, तिसऱ्या चेंडूवर अँडिले फेहलुकवायोने बचाव केल्याने त्याला विकेट मिळवता आली नाही.


दक्षिण आफ्रिकेला १३व्या षटकात ५८ धावांवर सातवा धक्का बसला. आवेश खानने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. मिलरला फक्त दोन धावा करता आल्या. मिलर बाद होताच केशव महाराजलाही फारसे काही करता आले नाही. ऋतुराज गायकवाडकरवी तो झेलबाद झाला. अर्शदीपने २६व्या षटकात पाचवी विकेट घेतली. तर, कुलदीपने शेवटची विकेट घेतली. आवेश पाच विकेट्स घेऊ शकला नाही. भारतीय गोलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकन संघ केवळ ११६ धावांची कामगिरी करु शकला आहे. भारत या सामन्यात आता आपली जादू दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच