केसांना महागडे तेल लावताय तर त्याऐवजी सुरू करा हे तेल, नक्की दिसेल फरक

मुंबई: आजच्या काळात केसांच्या समस्या खूप वाढत आहेत. केसांचे गळणे, कोंडा होणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाटी बाजारात विविध प्रकारची महागडी तेल मिळतात. मात्र अनेकदा यांचा काहीच फायदा होत नाही. याचा वापर करूनही केस गळती काही कमी होत नाही. अनेकदा तर केसांची स्थिती अधिकच बिघडते. अशातच एक चांगला पर्याय आहे ते म्हणजे राईचे तेल.


राईच्या तेलात व्हिटामिन ई, व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, अँटी ऑक्सिडंट आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडसारखी पोषक तत्वे आढळतात. ही सर्व पोषकतत्वे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. राईचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते. केसगळती कमी होते. केसांच्या समस्या जसे कोंड, खास यापासून आराम मिळतो. जाणून घेऊया केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे


राईच्या तेलाने मालिश - राईचे तेल गरम करून केस आणि स्काल्पवर चांगल्या पद्धतीने मालिश करा. यामुळे केसांना पोषण पोहोचते तसेच खाजही दूर होते.


तेलाचा लेप - केसांना सरळ तेल लावून एक तासभर तसेच ठेवा. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतील.


आठवड्यातून एक-दोन वेळा केसांना तेल मालिश - आठवड्यातून कमीत कमी एकदा केसांना मुळापासून ते खालीपर्यंत केलाने चांगला मसाज करा.


तेल आणि लिंबाचे मिश्रण - लिंबाच्या रसात थोडे राईचे तेल मिसळून लावल्याने केस अधिक मजबूत होतील आणि कोंडाही होणार नाही.



केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे


केसांना राईचे तेल पोषण देण्याचे काम करते. यामुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी बनतात. यामुळे केस वेगाने वाढतात.


केसांच्या मुळांना मजबुती देतात. तसेच केस पातळ होण्याची समस्या दूर होते.


केसांची गळती कमी होते. तसेच नवे केस येण्यास सुरूवात होते.


केसांना चमक येते तसेच ते मुलायम आणि कोमल बनतात.


केसांना खाज येण्याची समस्या दूर होते.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या