केसांना महागडे तेल लावताय तर त्याऐवजी सुरू करा हे तेल, नक्की दिसेल फरक

  590

मुंबई: आजच्या काळात केसांच्या समस्या खूप वाढत आहेत. केसांचे गळणे, कोंडा होणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाटी बाजारात विविध प्रकारची महागडी तेल मिळतात. मात्र अनेकदा यांचा काहीच फायदा होत नाही. याचा वापर करूनही केस गळती काही कमी होत नाही. अनेकदा तर केसांची स्थिती अधिकच बिघडते. अशातच एक चांगला पर्याय आहे ते म्हणजे राईचे तेल.


राईच्या तेलात व्हिटामिन ई, व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, अँटी ऑक्सिडंट आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडसारखी पोषक तत्वे आढळतात. ही सर्व पोषकतत्वे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. राईचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते. केसगळती कमी होते. केसांच्या समस्या जसे कोंड, खास यापासून आराम मिळतो. जाणून घेऊया केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे


राईच्या तेलाने मालिश - राईचे तेल गरम करून केस आणि स्काल्पवर चांगल्या पद्धतीने मालिश करा. यामुळे केसांना पोषण पोहोचते तसेच खाजही दूर होते.


तेलाचा लेप - केसांना सरळ तेल लावून एक तासभर तसेच ठेवा. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतील.


आठवड्यातून एक-दोन वेळा केसांना तेल मालिश - आठवड्यातून कमीत कमी एकदा केसांना मुळापासून ते खालीपर्यंत केलाने चांगला मसाज करा.


तेल आणि लिंबाचे मिश्रण - लिंबाच्या रसात थोडे राईचे तेल मिसळून लावल्याने केस अधिक मजबूत होतील आणि कोंडाही होणार नाही.



केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे


केसांना राईचे तेल पोषण देण्याचे काम करते. यामुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी बनतात. यामुळे केस वेगाने वाढतात.


केसांच्या मुळांना मजबुती देतात. तसेच केस पातळ होण्याची समस्या दूर होते.


केसांची गळती कमी होते. तसेच नवे केस येण्यास सुरूवात होते.


केसांना चमक येते तसेच ते मुलायम आणि कोमल बनतात.


केसांना खाज येण्याची समस्या दूर होते.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात