केसांना महागडे तेल लावताय तर त्याऐवजी सुरू करा हे तेल, नक्की दिसेल फरक

मुंबई: आजच्या काळात केसांच्या समस्या खूप वाढत आहेत. केसांचे गळणे, कोंडा होणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाटी बाजारात विविध प्रकारची महागडी तेल मिळतात. मात्र अनेकदा यांचा काहीच फायदा होत नाही. याचा वापर करूनही केस गळती काही कमी होत नाही. अनेकदा तर केसांची स्थिती अधिकच बिघडते. अशातच एक चांगला पर्याय आहे ते म्हणजे राईचे तेल.


राईच्या तेलात व्हिटामिन ई, व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, अँटी ऑक्सिडंट आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडसारखी पोषक तत्वे आढळतात. ही सर्व पोषकतत्वे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. राईचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते. केसगळती कमी होते. केसांच्या समस्या जसे कोंड, खास यापासून आराम मिळतो. जाणून घेऊया केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे


राईच्या तेलाने मालिश - राईचे तेल गरम करून केस आणि स्काल्पवर चांगल्या पद्धतीने मालिश करा. यामुळे केसांना पोषण पोहोचते तसेच खाजही दूर होते.


तेलाचा लेप - केसांना सरळ तेल लावून एक तासभर तसेच ठेवा. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतील.


आठवड्यातून एक-दोन वेळा केसांना तेल मालिश - आठवड्यातून कमीत कमी एकदा केसांना मुळापासून ते खालीपर्यंत केलाने चांगला मसाज करा.


तेल आणि लिंबाचे मिश्रण - लिंबाच्या रसात थोडे राईचे तेल मिसळून लावल्याने केस अधिक मजबूत होतील आणि कोंडाही होणार नाही.



केसांना राईचे तेल लावण्याचे फायदे


केसांना राईचे तेल पोषण देण्याचे काम करते. यामुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी बनतात. यामुळे केस वेगाने वाढतात.


केसांच्या मुळांना मजबुती देतात. तसेच केस पातळ होण्याची समस्या दूर होते.


केसांची गळती कमी होते. तसेच नवे केस येण्यास सुरूवात होते.


केसांना चमक येते तसेच ते मुलायम आणि कोमल बनतात.


केसांना खाज येण्याची समस्या दूर होते.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये