Fruits: ही फळे रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर, शरीराला मिळतात दुप्पट फायदे

मुंबई: शरीरास पोषण देण्याच्या बाबतीत फळाला कोणताच पर्याय नाही. फळे शरीराला विविध प्रकारची व्हिटामिन्स देतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. असे यासाठी कारण रिकामे पोट अधिक प्रमाणात पोषकतत्वे शोषून घेते. त्याचवेळेस आपली पाचनसंस्था अन्य खाद्य पदार्थांसोबत स्पर्धा करत नसते. अशातच आम्ही तुम्हाला अशा सात फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने अधिकाधिक लाभ मिळू शकतात.



पपई


पपईमध्ये पपेन आणि कायमोपॅपेनसारखे एन्झाईम मोठ्या प्रमाणात असतात. हे एन्झाईम पचनशक्ती सुधारण्यासाठी बद्धकोष्ठता रोखण्यासाठी जबाबदार आहेत. जेव्हा पपईचे रिकाम्या पोटी सेवन केले जाते तेव्हा पपईमधील व्हिटामिन ए, सी आणि ई चांगल्या प्रमाणात शरीरात शोषले जातात.



टरबूज


जर तुम्ही सकाळी उठल्यावर टरबूज खात असाल तर संपूर्ण रात्रभरानंतर हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्याचे काम करते. कारण यात ९२ टक्के पाणी असते. यात लायकोपीन हे अँटी ऑक्सिडंट असते.



ब्लू बेरी


सकाळी सकाळी जर गोड खायची इच्छा झाली तर ब्लू बेरी खा. यात अँटी ऑक्सिडंट असतात जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मेंदूला उर्जा मिळते. तसेच शुगरही कंट्रोलमध्ये राहते.



केळी


सकाळी सकाळी केळी खाल्ल्याने शरीरास भरपूर उर्जा मिळते. यातील कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणात असते.



अननस


अननस रिकाम्या पोटी खाण्यासाठी चांगले फळ आहे. यात व्हिटामिन सी आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. तसेच हाडेही मजबूत होतात.



सफरचंद


दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतात ही म्हण खरी आहे. जेव्हा रिकाम्या पोटी सफरचंद खातो तेव्हा ते आरोग्यासाठी चांगले असते. यात फायबर असतात जे पचनासाठी चांगले असतात. तसेच भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.



किवी


किवी भले छोटे फळ आहे मात्र हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मोठे फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Comments
Add Comment

Rashmi Sukhla : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट!

प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर घेतली निवृत्ती मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण

मुंबई उपनगरीय रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक

मध्य व पश्चिम रेल्वेवरील सेवांमध्ये बदल मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल व

ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन

नको सुट्ट्या पैशाची कटकट... तिकीट काढा झटपट...!

एसटीच्या यूपीआयमार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)

दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा