Fruits: ही फळे रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर, शरीराला मिळतात दुप्पट फायदे

मुंबई: शरीरास पोषण देण्याच्या बाबतीत फळाला कोणताच पर्याय नाही. फळे शरीराला विविध प्रकारची व्हिटामिन्स देतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. असे यासाठी कारण रिकामे पोट अधिक प्रमाणात पोषकतत्वे शोषून घेते. त्याचवेळेस आपली पाचनसंस्था अन्य खाद्य पदार्थांसोबत स्पर्धा करत नसते. अशातच आम्ही तुम्हाला अशा सात फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने अधिकाधिक लाभ मिळू शकतात.



पपई


पपईमध्ये पपेन आणि कायमोपॅपेनसारखे एन्झाईम मोठ्या प्रमाणात असतात. हे एन्झाईम पचनशक्ती सुधारण्यासाठी बद्धकोष्ठता रोखण्यासाठी जबाबदार आहेत. जेव्हा पपईचे रिकाम्या पोटी सेवन केले जाते तेव्हा पपईमधील व्हिटामिन ए, सी आणि ई चांगल्या प्रमाणात शरीरात शोषले जातात.



टरबूज


जर तुम्ही सकाळी उठल्यावर टरबूज खात असाल तर संपूर्ण रात्रभरानंतर हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्याचे काम करते. कारण यात ९२ टक्के पाणी असते. यात लायकोपीन हे अँटी ऑक्सिडंट असते.



ब्लू बेरी


सकाळी सकाळी जर गोड खायची इच्छा झाली तर ब्लू बेरी खा. यात अँटी ऑक्सिडंट असतात जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मेंदूला उर्जा मिळते. तसेच शुगरही कंट्रोलमध्ये राहते.



केळी


सकाळी सकाळी केळी खाल्ल्याने शरीरास भरपूर उर्जा मिळते. यातील कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणात असते.



अननस


अननस रिकाम्या पोटी खाण्यासाठी चांगले फळ आहे. यात व्हिटामिन सी आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. तसेच हाडेही मजबूत होतात.



सफरचंद


दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतात ही म्हण खरी आहे. जेव्हा रिकाम्या पोटी सफरचंद खातो तेव्हा ते आरोग्यासाठी चांगले असते. यात फायबर असतात जे पचनासाठी चांगले असतात. तसेच भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.



किवी


किवी भले छोटे फळ आहे मात्र हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मोठे फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Comments
Add Comment

दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण

येत्या ३१ मे २०२६पर्यंत होणार वाहतुकीसाठी पूल खुले मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प

मुंबईत रस्त्यांच्या दुतर्फा विजेच्या खांबावर अनधिकृत बॅनर

मुंबई महापालिकेच्या परवाना विभागात ३ पोलिस ठाण्यात एफआयआर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे राणीबागेतला महापौर बंगला

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा

मुंबईत मंगळवारपासून पुढील सात दिवस शहर आणि पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या

Mahalakshmi Bridge : रेल्वे रुळांवरून धावणार पालिकेचा पहिला 'केबल-स्टेड' पूल; ५५% काम फत्ते; सात रस्ता, महालक्ष्मी...अजून कुठे कुठे? पाहा नेमका मार्ग

मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे