मुंबई: शरीरास पोषण देण्याच्या बाबतीत फळाला कोणताच पर्याय नाही. फळे शरीराला विविध प्रकारची व्हिटामिन्स देतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. असे यासाठी कारण रिकामे पोट अधिक प्रमाणात पोषकतत्वे शोषून घेते. त्याचवेळेस आपली पाचनसंस्था अन्य खाद्य पदार्थांसोबत स्पर्धा करत नसते. अशातच आम्ही तुम्हाला अशा सात फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने अधिकाधिक लाभ मिळू शकतात.
पपईमध्ये पपेन आणि कायमोपॅपेनसारखे एन्झाईम मोठ्या प्रमाणात असतात. हे एन्झाईम पचनशक्ती सुधारण्यासाठी बद्धकोष्ठता रोखण्यासाठी जबाबदार आहेत. जेव्हा पपईचे रिकाम्या पोटी सेवन केले जाते तेव्हा पपईमधील व्हिटामिन ए, सी आणि ई चांगल्या प्रमाणात शरीरात शोषले जातात.
जर तुम्ही सकाळी उठल्यावर टरबूज खात असाल तर संपूर्ण रात्रभरानंतर हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्याचे काम करते. कारण यात ९२ टक्के पाणी असते. यात लायकोपीन हे अँटी ऑक्सिडंट असते.
सकाळी सकाळी जर गोड खायची इच्छा झाली तर ब्लू बेरी खा. यात अँटी ऑक्सिडंट असतात जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मेंदूला उर्जा मिळते. तसेच शुगरही कंट्रोलमध्ये राहते.
सकाळी सकाळी केळी खाल्ल्याने शरीरास भरपूर उर्जा मिळते. यातील कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणात असते.
अननस रिकाम्या पोटी खाण्यासाठी चांगले फळ आहे. यात व्हिटामिन सी आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. तसेच हाडेही मजबूत होतात.
दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतात ही म्हण खरी आहे. जेव्हा रिकाम्या पोटी सफरचंद खातो तेव्हा ते आरोग्यासाठी चांगले असते. यात फायबर असतात जे पचनासाठी चांगले असतात. तसेच भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.
किवी भले छोटे फळ आहे मात्र हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मोठे फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…