Fruits: ही फळे रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर, शरीराला मिळतात दुप्पट फायदे

मुंबई: शरीरास पोषण देण्याच्या बाबतीत फळाला कोणताच पर्याय नाही. फळे शरीराला विविध प्रकारची व्हिटामिन्स देतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. असे यासाठी कारण रिकामे पोट अधिक प्रमाणात पोषकतत्वे शोषून घेते. त्याचवेळेस आपली पाचनसंस्था अन्य खाद्य पदार्थांसोबत स्पर्धा करत नसते. अशातच आम्ही तुम्हाला अशा सात फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने अधिकाधिक लाभ मिळू शकतात.



पपई


पपईमध्ये पपेन आणि कायमोपॅपेनसारखे एन्झाईम मोठ्या प्रमाणात असतात. हे एन्झाईम पचनशक्ती सुधारण्यासाठी बद्धकोष्ठता रोखण्यासाठी जबाबदार आहेत. जेव्हा पपईचे रिकाम्या पोटी सेवन केले जाते तेव्हा पपईमधील व्हिटामिन ए, सी आणि ई चांगल्या प्रमाणात शरीरात शोषले जातात.



टरबूज


जर तुम्ही सकाळी उठल्यावर टरबूज खात असाल तर संपूर्ण रात्रभरानंतर हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्याचे काम करते. कारण यात ९२ टक्के पाणी असते. यात लायकोपीन हे अँटी ऑक्सिडंट असते.



ब्लू बेरी


सकाळी सकाळी जर गोड खायची इच्छा झाली तर ब्लू बेरी खा. यात अँटी ऑक्सिडंट असतात जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मेंदूला उर्जा मिळते. तसेच शुगरही कंट्रोलमध्ये राहते.



केळी


सकाळी सकाळी केळी खाल्ल्याने शरीरास भरपूर उर्जा मिळते. यातील कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणात असते.



अननस


अननस रिकाम्या पोटी खाण्यासाठी चांगले फळ आहे. यात व्हिटामिन सी आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. तसेच हाडेही मजबूत होतात.



सफरचंद


दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतात ही म्हण खरी आहे. जेव्हा रिकाम्या पोटी सफरचंद खातो तेव्हा ते आरोग्यासाठी चांगले असते. यात फायबर असतात जे पचनासाठी चांगले असतात. तसेच भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.



किवी


किवी भले छोटे फळ आहे मात्र हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने मोठे फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक