Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध कोणाचा?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट नावच सांगितले


नागपूर : मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देण्यास कोणाकोणाचा विरोध आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार (sharad Pawar) यांनी केला असल्याचे खळबळजनक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी समाजाला झुलवत ठेवले, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले आहे.



मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते न्यायालयात टिकवून दाखवले. आपले सरकार असेपर्यंत ते आरक्षण टिकले आणि सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली, अशी माहिती फडणवीस यांनी भाजपच्या नागपूर येथील बैठकीत बोलताना दिली.


ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते, असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला