Rajasthan: आज बनणार राजस्थानचे नवे सरकार, भजनलाल शर्मा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीत(rajasthan assembly election) दमदार विजय मिळवल्यानंतर आता तेथे नवे सरकार स्थापन होण्यासाठी सज्ज झाले आहे. या ठिकाणी भाजपने बंपर विजय मिळवला. भाजपने विजयानंतर भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. भजनलाल यांच्याशिवया भाजपने राजस्थानात दोन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही लावला. दिया कुमार आणि प्रेमचंद बैरवा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. हे तिघेही शुक्रवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.


राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र हे राज्याचे नवे मुख्यमंत्री यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राजस्थानातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित असतील. अल्बर्ट हॉलबाहेरील रामनिवास बाग येथे हा शपथविधी सोहळा रंगणार आहे.


भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा हे कॅबिनेट मंत्रीची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्यात संपूर्ण राजस्थानातील कार्यकर्ते असणार आहेत. अशातच विविध कार्यक्रमांसाठी भाजपने प्रदेश अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत.


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला हरवत १९९ विधानसभा जागांपैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला येथे केवळ ६९ जागा मिळाल्या. विजयानंतर राजस्थानातील मुख्यमंत्रीपदासाठी बराच काळ चर्चा सुरू होती. अखेर भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.