Rajasthan: आज बनणार राजस्थानचे नवे सरकार, भजनलाल शर्मा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

  85

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीत(rajasthan assembly election) दमदार विजय मिळवल्यानंतर आता तेथे नवे सरकार स्थापन होण्यासाठी सज्ज झाले आहे. या ठिकाणी भाजपने बंपर विजय मिळवला. भाजपने विजयानंतर भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. भजनलाल यांच्याशिवया भाजपने राजस्थानात दोन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही लावला. दिया कुमार आणि प्रेमचंद बैरवा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. हे तिघेही शुक्रवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.


राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र हे राज्याचे नवे मुख्यमंत्री यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राजस्थानातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित असतील. अल्बर्ट हॉलबाहेरील रामनिवास बाग येथे हा शपथविधी सोहळा रंगणार आहे.


भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा हे कॅबिनेट मंत्रीची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्यात संपूर्ण राजस्थानातील कार्यकर्ते असणार आहेत. अशातच विविध कार्यक्रमांसाठी भाजपने प्रदेश अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत.


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला हरवत १९९ विधानसभा जागांपैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला येथे केवळ ६९ जागा मिळाल्या. विजयानंतर राजस्थानातील मुख्यमंत्रीपदासाठी बराच काळ चर्चा सुरू होती. अखेर भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.