Mohammed Shami: क्रिकेटर मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत, बीसीसीआयने केली शिफारस

नवी दिल्ली: वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतासाठी वनडे विश्वचषक २०२३मध्ये हिरो ठरला होता. शमी या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. आता विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की बीसीसीआयने स्पोर्ट्स मिनिस्ट्रीे शमीच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्काराच्या यादीत सामील करण्याबाबत केली आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील दुसरा मोठा पुरस्कार आहे.


मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड आणि अर्जुन अवॉर्डसह या वर्षाच्या क्रीडा पुरस्कारावर विचार करण्यासाठी १२ सदस्यीय समिती बनवली आहे. याचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एएम खानविलकर करत आहेत. याशिवाय या समितीमध्ये एकूण ६ सदस्य आणखी असतील जे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील.



विश्वचषकात दमदार कामगिरी


विश्वचषक २०२३मध्ये शमीने ७ सामन्यांत १०.७१च्या सरासरीने २४ विकेट मिळवले होते. जे आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट होत्या. विश्वचषकाच्या सुरूवातीचे चार सामने शमी खेळला नव्हता. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने शमीला न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. शमी विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याने विश्वचषकात सर्वात वेगवान ५० विकेट घेण्याचाही रेकॉर्ड केला होता.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना