Mohammed Shami: क्रिकेटर मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत, बीसीसीआयने केली शिफारस

नवी दिल्ली: वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतासाठी वनडे विश्वचषक २०२३मध्ये हिरो ठरला होता. शमी या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. आता विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की बीसीसीआयने स्पोर्ट्स मिनिस्ट्रीे शमीच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्काराच्या यादीत सामील करण्याबाबत केली आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील दुसरा मोठा पुरस्कार आहे.


मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड आणि अर्जुन अवॉर्डसह या वर्षाच्या क्रीडा पुरस्कारावर विचार करण्यासाठी १२ सदस्यीय समिती बनवली आहे. याचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एएम खानविलकर करत आहेत. याशिवाय या समितीमध्ये एकूण ६ सदस्य आणखी असतील जे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील.



विश्वचषकात दमदार कामगिरी


विश्वचषक २०२३मध्ये शमीने ७ सामन्यांत १०.७१च्या सरासरीने २४ विकेट मिळवले होते. जे आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट होत्या. विश्वचषकाच्या सुरूवातीचे चार सामने शमी खेळला नव्हता. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने शमीला न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. शमी विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याने विश्वचषकात सर्वात वेगवान ५० विकेट घेण्याचाही रेकॉर्ड केला होता.

Comments
Add Comment

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती