Parliament Security Breachमध्ये मोठा खुलासा, दीड वर्षांपूर्वी मैसूरमध्ये भेटले होते सर्व आरोपी

नवी दिल्ली: संसद घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांना अटक केली होती. चारही आरोपींकडून दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे नवनवे खुलासे समोर येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली आहे की संसदेत घुसखोरी करण्याचा कट तब्बल दीड वर्षांपूर्वी रचण्यात आला होता.


सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबच्या माध्यमातून जोडले गेले होते. हे सर्वजण दीड वर्षांपूर्वी मैसूर येथे भेटले होते. तेव्हाच याचा कट रचण्यास सुरूवात झाली होती. चौकशीदरम्यान असेही समोर आले की १० डिसेंबरला सर्वजण एकएक करून दिल्लीला पोहोचतील आणि १० डिसेंबरच्या रात्रीच सर्व आरोपी गुरूग्राममध्ये विक्कीच्या घरी पोहोचले होते. रात्री उशिरा ललित झाही विक्कीच्या घरी पोहोचले होते.



जुलैमध्ये केली होती संसदेची रेकी


सूत्रांच्या माहितीनुसार, हा कट सत्यात उतरवण्याआधी आरोपींनी संसदेची रेकीही केली होती. जुलैमध्ये सागरला संसद भवनाची रेकी करण्यासाठी लखनऊवरून दिल्लीला पाठवण्यात आले होते. जुलैमध्ये सागर संसद भवनाच्या आत जाण्यास यशस्वी ठरला नव्हता. यानंतर तो संसद भवनाच्या बाहेरून गेट आणि सुरक्षा विभागाची रेकी करून निघून गेला होता.



अमोल घेऊन आला होता स्मोक कँडल्स


चौकशीदरम्यान असेही समोर आले आहे आरोपी अमोल महाराष्ट्रातून स्मोक क्रॅकर घेऊन आला होता. हे सर्व घडण्याआधी हे आरोपी इंडिया गेटवर भेटले होते. येथे सर्वांना स्मोक क्रॅकर वाटण्यात आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी संसदेत दाखल झाले होते. तर अमोल शिंदे आणि नीलम आझाद हे संसदेच्या बाहेर होते. ललित या सर्वांचे व्हिडिओ बनवत होता. गदारोळानंतर जसे पोलिसांनी अमोल आणि नीलमला ताब्यात घेतले ललित सर्वांचे फोन घेऊन त्या ठिकाणाहून फरार झाला.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी